शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

इगतपुरी तालुक्यातील चाळीस गावे पोरकीच

By admin | Updated: February 18, 2016 23:00 IST

नाराजी : सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर उपेक्षा; रस्त्याची दुरवस्था; पाण्याचे दुर्भिक्ष

 सुनील शिंदे घोटीइगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील चाळीस गावे सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर या गावातील जनता मोठ्या अपेक्षेने शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभी राहिली होती. परिणामी याच भागातून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने अगदी काट्याच्या लढाईत वाजे विजयी झाले होते. या चाळीस गावातील नागरिकांनी आपणावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचनही देण्यात आले होते, परंतु वर्ष उलटूनही या भागाकडे पाठ फिरविल्याने विकासकामांची मागणी कोणाकडे करायची या विवंचनेत या भागातील जनता आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या चाळीस गावांच्या विकासाबाबत कोणतीही आढावा बैठक झाली नसल्याने ही चाळीस गावे विकासापासून दूर आहेत.विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोरपासून आंबेवाडी, टाकेद, कवडधरा असा चाळीस गावांचा भाग सिन्नर मतदारसंघाला जोडण्यात आला. कायम उपेक्षित असणाऱ्या या गावांना सिन्नरला जोडल्याने या गावातील ग्रामस्थांच्या विकासाबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या आणि मोठ्या अपेक्षेने राजाभाऊ यांच्यावर विश्वास दाखवित मताधिक्य दिले. परंतु या वर्षाचा कार्यकाल संपूनही अद्यापही या भागात लक्षणीय ठरतील अशी कोणतीही विकासकामे न झाल्याने या भागातील जनता नाराज आहे. या भागात असणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद या धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने हे ठिकाण तालुक्यातील इतर धार्मिक ठिकाणच्या तुलनेत उपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून आमदार वाजे यांनी या भागातील व्यथा, समस्या, प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी या भागात फिरकले नसल्याने, आपली गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे असा प्रश्न पडला आहे. तर वर्षापासून एकही आमसभा तर नाहीच पण साधी बैठक अथवा आढावा बैठकही न झाल्याने शासनाने या भागासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या, यासाठी अनुदान किती? आदि माहितीपासून येथील जनता अज्ञभिज्ञ असल्याचे दिसते.रस्त्याची प्रचंड दुरवस्था या भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून यात धामणगाव ते टाकेद रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याबरोबरच टाकेद-वासाळी रस्ता, घोटी-सिन्नर राज्यमार्ग, टाकेद फाटा ते अधरवड, टाकेद, वासाळी फाटा ते आंबेवाडी कुरुंगवाडी या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने दयनीय अवस्था झाली आहे. याजबरोबर अडसरे ते टाकेद रस्त्यावरील पुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून रखडल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्षशासनाकडून राबविलेल्या पाणीपुरवठा योजना या भागातील अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणामुळे व आमदार वाजे यांच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत आहेत. यातील काही योजनेतील विद्युत मोटारींची बिले न भरल्यामुळे तर काही ठिकाणची सामग्री जीर्ण झाल्यामुळे व चोरीला गेल्यामुळे बंद अवस्थेत असल्याने याचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसत आहे. पावसाने या भागाकडे पाठ फिरविल्याने या भागातील पाणीटंचाई ऐन पावसाळ्यात जैसे थे असल्याचे दिसते.शिक्षण व आरोग्याची ऐसी तैसीया भागातील प्राथमिक शाळातील शिक्षणासह आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचवावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शासन सर्वशिक्षा अभियानातून शाळांसाठी विविध योजना राबवित असताना, शिक्षकावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने या योजना या भागात नामधारी ठरल्या आहेत. या भागातील अनेक शिक्षक नाशिक, भगूर, घोटी, राजूर येथून ये- जा करीत असल्याने उशिरा शाळा भरून लवकर सोडण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.तर अनेक शिक्षक पंधरा पंधरा दिवस शाळेकडे ढुंकूनही पाहत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. या भागात धामणगाव व खेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब जनतेला विनामूल्य मिळणारी आरोग्यसेवा संपूर्णपणे ढासळली आहे.