शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

जिल्हा पोलीस प्रमुखांवर माजी आमदाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST

येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. विद्यमान ...

येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहरातील प्रांत, तहसीलदार, पुरवठा शाखा व संजय गांधी निराधार शाखेतील अधिकाऱ्यांवर विद्यमान आमदारांचा दबाव नाही. त्यामुळे संजय गांधी योजना राबविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. नागरिकांची कामे रखडली आहेत. शहरात कुत्ता गोळी, गांजा, चरसची सर्रास विक्री केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जात आहे. गुंडागर्दी मुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांच्याकडून स्थानिक यंत्रणेवर दबाव आणला जात आहे. विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मो.इस्माईल पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोपही शेख यांनी केला. शहरातील काही राजकीय लोकांकडून गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचेही माजी आमदार शेख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते असलम अन्सारी, जाकीर शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोट....

राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. माझे राजकीय विरोधक असल्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. माझे शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे नाहीत. दारू व जुगार,मटका,रेशन भ्रष्टाचार यासारखे दोन नंबरचे व्यवसाय मी करीत नाही. मी एक धार्मिक व्यक्ती आहे. पैशांच्या देवाण-घेवाण पासून दूर राहतो. माझ्यावरील आरोपांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही

- मौलाना मुफ्ती मो इस्माईल, आमदार

कोट....

माजी आमदार रशीद शेख यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात माझ्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. या धाडीमध्ये अवैध धंदे मोडीत काढले आहेत. अवैध धंदे मोडीत काढण्याची कारवाई सुरूच राहणार आहे . नाशिक पोलीस यंत्रणा बॅकफुटवर जाणार नाही. अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले जाईल.

- सचिन पाटील,पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण