शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जिल्ह्यात ७०० गावांत वनसंवर्धन

By admin | Updated: March 21, 2017 00:45 IST

५५ टक्के वनक्षेत्र : लोकसहभागातून वनविकासावर भर; संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमध्ये वाढ

अझहर शेख :  नाशिकगावपातळीवरील वनसंवर्धन व वनसंरक्षण स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. सदर बाब लक्षात घेऊन वन विभागाकडून वनविकासाबरोबरच जैवविविधता जोपासण्यासाठी नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील एकूण १४ तालुक्यांमध्ये सुमारे सातशे संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन व वन्यजीव संवर्धन केले जात आहे. नाशिक जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभलेले असून, शहरासह जिल्ह्यांमधील विविध तालुक्यांत वने व वन्यजीवांचे प्रमाण चांगले असून, त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून लोकसहभाग वाढविला जात आहे. यासाठी पूर्व व पश्चिम विभागाच्या हद्दीमधील तालुक्यातील गावे, आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना विश्वासात घेऊन संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची रचना करून त्या माध्यमातून त्या परिसरातील वनजमिनीवर वृक्षलागवड व संवर्धन तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर वनविभाग भर देत आहेत. नाशिक पूर्व विभागात एकूण ३२० तर पश्चिम विभागाच्या हद्दीत एकूण ३९४ गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जंगल संरक्षणासह जंगलवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. वन विभागाने जिल्ह्यातील विविध गावांमधील वनजमिनींवर २००५ सालानंतर करण्यात आलेले अतिक्रमण काढून त्या जागेवर रोपवन योजनेंतर्गत वनीकरण करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन विकासाची विविध कामे गावपातळीवर केली जात आहे. वननिर्मितीसाठी वृक्षलागवड व संवर्धन, डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविणे, समपातळीवर चर खोदणे यांसारख्या उपाययोजना करत वनवाढीसाठी पूरक ठरणारे मृदा व जलसंधारणाची कामे केली जात आहे.