शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकसहभागातूनच वनसंवर्धन, जलसंवर्धन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

येवला : शासकीय पातळीवर वृक्ष व जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी लोकसहभागातूनच वनसंवर्धन व जलसंवर्धन ...

येवला : शासकीय पातळीवर वृक्ष व जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी लोकसहभागातूनच वनसंवर्धन व जलसंवर्धन शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. गौतम कोलते यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्तपणे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ‘वृक्ष व जल संवर्धन काळाची गरज’ या विषयावर प्रा. डॉ. गौतम कोलते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वनांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऱ्हासामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे, निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली आहे. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला आहे. हवामान बदलावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. पशू-पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट झाल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच पृथ्वीच्या विनाशाकडे आपण जात आहोत. हे सर्व थांबवायचे असेल तर वनसंवर्धन केलेच पाहिजे, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, ते जगवावे असे आवाहन करून, लोकसहभागाशिवाय वनसंवर्धनाची मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, असेही डॉ. कोलते म्हणाले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. विलास खैरनार, प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. कैलास बच्छाव यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले. आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.

---------------------

येवला महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गौतम कोलते. मंचावर प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे व डॉ. धनराज धनगर. (२२ येवला २)

===Photopath===

220321\22nsk_33_22032021_13.jpg

===Caption===

२२ येवला २