शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र धोरण चुकीचे : शिंदे

By admin | Updated: September 26, 2016 01:11 IST

परराष्ट्र धोरण चुकीचे : शिंदे

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानचा मुद्दा काढून पाकिस्तानला उकसवण्याचे काम केले़ केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्रीय धोरणामुळे तसेच इंटेलिजन्स, मिलिटरी, पोलीस या यंत्रणांमधील असमन्वयामुळेच काश्मीरमधील उरी येथे आत्मघाती हल्ला झाल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ राज्यातील मराठा मोर्चाचे अभिनंदन करून त्यांना आरक्षण देणे शक्य असल्याचेही ते म्हणाले़नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्यानंतर हा देशावरील शेवटचा हल्ला आहे असे केंद्रातर्फे सांगितले गेले होते़ यानंतर एका सैनिकाचे शिर कापून नेल्याच्या घटनेनंतर ‘एक के बदले हम दस शिर लाऐंगे’ अशीही घोषणा करण्यात आली होती़ भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम असतानाही उरीतील सैन्य दलाच्या मुख्यालयावर हल्ला होतो व १७ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात याचा अर्थ गुप्तचर यंत्रणा, सैन्यदल, पोलीस, एजन्सी यांच्यामध्ये समन्वय नाही़ सद्यस्थितीत सुरू असलेली युद्धाची भाषा ही देशाला न परवडण्यासारखी आहे़ १९६५, १९७१ व अगदी अलीकडेच कारगील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे शिंदे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)मराठा समाजाला आरक्षण देणे शक्यराज्यातील सर्व जिल्ह्णांमध्ये सध्या मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढतो आहे़ मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र झाला ही अभिनंदनाची बाब असून, विशेष म्हणजे हे मोर्चे अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने निघत आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले़ अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलाबाबत बोलताना हा केंद्रसरकारचा कायदा असून, त्याचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी राज्यसरकारची असल्याचे ते म्हणाले़