शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा

By admin | Updated: November 15, 2014 01:00 IST

मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा

नाशिक : सामान्य व्यावसायिकाच्या समस्या समजून न घेता केवळ मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा बनविला गेला असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी येथे केला़ गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृह येथे नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी होते़ भोगले म्हणाले, एलबीटी तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील जाचक अटींबाबत ते करणाऱ्यांची जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु त्यांची मानसिकता जाणून घेतल्याशिवाय व ती बदलल्याशिवाय या कायद्यामध्ये बदल होणार नाही़ तसेच आपल्यातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी या कायद्यांना का मान्यता देतात हे पाहण्याची वेळ आली आहे़ नवे सरकार सर्वांना बरोबर घेऊन बदल घडवून आणण्याचे आश्वासन देत आहे, तर आपण व्यापाऱ्यांनीही सरकारने आपणावर विश्वास ठेवावा असा व्यवसाय करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अरुण गुजराथी म्हणाले, व्यापार केवळ पैशांवर चालत नाही, त्याला पैशाच्या भांडवलाप्रमाणे विश्वासाचेही भांडवल लागते़ ग्राहक हे पैसा कमावण्याचे साधन नाही, तर व्यवसाय ही एक सेवा आहे़ यामुळे ग्राहकाला न फसवता आपला व्यवसाय वाढविण्याची गरज आह़े शासन हे करांशिवाय चालू शकत नाही़ उद्या शासनाने एलबीटी बंद केला तरी दुसरा कर सुरू करेलच. यासाठी सर्व संघटनांची एकजूट व्हावी़ स्पर्धा आणि सहकार्य हेच आपले जीवन आहे़ संघटनेने स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा़ याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते सभासद सूचीचे प्रकाशन करण्यात आले़ तसेच संघटनेचे अध्यक्ष अरुण जातेगावकर यांचा विशेष सत्कार अरुण गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी प्रवीण मसालेचे संचालक हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, दिलीप साळवेकर, घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजन दलवानी, नंदकुमार कर्पे, चंद्रकांत दीक्षित आदि उपस्थित होते़