शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अन्न नमुने अद्यापही अहवालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:30 IST

दिवाळीच्या काळात घेण्यात आलेल्या सुमारे २०० अन्न नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्राप्त नसल्याने भेसळ आणि शुद्धतेच्या बाबतीत वराती मागून घोडे असा प्रकार समोर आला आहे. अन्न नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथून प्राप्त होणाºया अहवालानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे.

नाशिक : दिवाळीच्या काळात घेण्यात आलेल्या सुमारे २०० अन्न नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्राप्त नसल्याने भेसळ आणि शुद्धतेच्या बाबतीत वराती मागून घोडे असा प्रकार समोर आला आहे. अन्न नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथून प्राप्त होणाºया अहवालानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. साधारणपणे महिनाभरानंतर याबाबतचे अहवाल प्राप्त होणार असल्याने दोषी नमुने असलेल्यांवर दिवाळीनंतर कारवाईने नेमके काय निष्पन्न होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  कोणताही सण किंवा धार्मिक सोहळा असला की अन्न सुरक्षा विभागाची जबाबदारी अधिक वाढते. अन्नातून विषबाधा होऊ नये किंवा ते अन्न भेसळमुक्त असावे यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित विभागाला करावे लागते. दिवाळीत तर अन्न सुरक्षा विभागाला अधिक दक्ष रहावे लागते. मात्र या काळात करण्यात आलेली कारवाई केवळ प्रयोगशाळेच्या अहवालावरच अवलंबून असल्याने कारवाईचा फार्स कशासाठी? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. खाद्यतेल, वनस्पती तूप, आटा, रवा, खवा, स्पेशल बर्फी यांची संशयावरून तपासणी करण्यात येऊन नमुने ताब्यात घेण्यात आले होते. सदर नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले असून, दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अद्यापही या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दिवाळीत मिठाई मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. कित्येकदा तयार मिठाई किंवा मिठाई बनविण्यासाठी लागणारा मावा यांची अवैध वाहतूकही केली जाते. अन्न व सुरक्षा विभागाचे या काळात संबंधित विक्रेते आणि कारखान्यांकडे विशेष लक्ष असते. मात्र यंदा अवैध वाहतूक आणि मिठाई बनविणाºया कारखान्यांच्या बाबतीत अन्न सुरक्षा विभागाने गांभीर्याने पाहिले नसल्याचे बोलले जात आहे.  गुप्तचर यंत्रणेकडून काही माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने शहरातील काही कारखान्यांवर पहाटेच्या सुमारास कारवाई केली. काही ठिकाणी टाकलेल्या धाडीत आक्षेपार्ह बाबी समोर आल्यानंतरही या कारखान्यांवर अद्याप अपेक्षित कारवाई करण्यात आली नाही, तर प्रयोगशाळेचाही अहवाल नसल्याने नमुने घेऊनही नेमके काय साध्य झाले अशी एकूणच परिस्थिती असल्याने दिवाळीतील मिठाई खाऊन झाल्यानंतर होणारी कारवाई औपचारिकच ठरणारी असल्याची चर्चा होऊ लागली आहे.भेसळीचे प्रमाण कमीचअन्नांमध्ये भेसळीचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे आता भेसळ हा महत्त्वाचा मुद्दा नसून सुरक्षा हाच मुद्दा केंद्रस्थानी आहे. अन्न सुरक्षेविषयी आमच्या विभागाकडून जनजागृती केली जाते. अन्नाचे २२१ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. अहवालानंतर कारवाईचे स्वरूप ठरेल. अन्नात कमी दर्जा आढळला तर दंडात्मक कारवाई तर असुरक्षित अन्न तपासणीत समोर आले तर फौजदारी कारवाई होते. दिवाळीत कारखान्यांवर धाड टाकण्यात आलेली नाही.- उदय वंजारी, सहआयुक्त,  अन्न सुरक्षा विभाग, नाशिक