शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

त्रिसूत्रीचे पालन करून धम्म आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.गोल्फ क्लब येथे दहा दिवसांच्या अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भदन्त ज्ञानज्योती, भदन्त प्रज्ञा बोधी, माजी नगरसेवक उषा अहिरे, वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक रमेश बनसोड, राहुल बच्छाव, विजयकुमार खंडागळे, योगेश जाधव, मोहन अढांगळे, रमेश जगताप, भाउराव वानखेडे, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भन्ते करुणानंद म्हणाले की, आज समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. आज आपण दुसºया समाजाला नावे ठेवतो, परंतु कुंपणच शेत खात असताना शेजाºयाशी भांडून काय फायदा, असे परखड विचार त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री कार्यक्र म जाहीर केला होता. परंतु तो कार्यक्र मदेखील आज यशस्वी होऊ शकलेला नाही, ही शोकांतिका आहे. वर्तमान स्थितीत समाजाचे अवलोकन केले तर समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती निराशाजनक आहे. असेही ते म्हणाले. भदन्त ज्ञानज्योती यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माची आज निर्मिती होण्याची गरज आहे. प्रास्ताविक रमेश बनसोड यांनी केले. बनसोड म्हणाले की, प्रत्येक घरातून एक श्रामणेर निर्माण करण्याची आज गरज आहे. आपल्या समाजाची ओळख निर्माण होईल असे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मोहन अढांगळे यांनी कार्यक्र माची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.