शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

खासदारांच्या निवासस्थानी लोकगीतांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:01 IST

पेठ : महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.

ठळक मुद्देमानधनासाठी साकडे : आदिवासी लोक कलाकारांचे अनोखे गाºहाणे

पेठ :  महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.पेठ तालुक्यातील बहुतांश गावात पारंपारिक आदिवासी वाद्य, गीते व नृत्य करणारे कलापथक आहेत. पातळी, धाब्याचापाडा येथील आदिवासी कलापथकांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. मात्र एकीकडे आदिवासी संस्कृतीचे जतन करत असतांना यासाठी लागणारे साहित्य खरेदी, प्रवासासाठी लागणारा खर्च व जाणारा वेळ यामुळे लोककलावंताच्या कुटुंबात आर्थिक कुंचबना होतांना दिसून येत आहे. शिवाय वयाच्या साठीनंतर अशा कलावंतांना परावलंबी जीवन जगावे लागत असल्याने किमान पोटाची खळगी भरण्याइतपत शासनाने मानधन द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. बहुतांश कलावंत हे गावोगाव विखुरलेले असल्याने त्यांचे संघटन होऊ शकत नाही. शासन दरबारी दुर्लक्षति राहिलेल्या या कलावंतानी आपल्या ढोलकी तुणतुण्यासह थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाशिकिस्थत निवासस्थान गाठले. आपली मागणी शासन दरबारी पोहचवण्याची विनंती करतांना चव्हाण यांच्या इच्छेरून पारंपारिक लोकगीतांचा जागर घालण्यात आला. आतातरी शासन या कलावंताना मानधन सुरू करेल का ? असा सवाल उपस्थित कलाकारांच्या मनात आहे.आदिवासी लोककलावंताना मानधन सुरू करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.पेठ -सुरगाणा तालुक्यात विविध धार्मिक व पारंपारिक उत्सवाच्या निमित्ताने अशिक्षति लोककलावंत गावोगाव फिरून लोककला सादर करत असतांना उतारवयात अशा कलावंतांना आर्थिक कुंचबना सहन करावी लागते. तरी शासनाने अशा दुर्लक्षति लोककलावंतांचे स्वतंत्र यंत्रणेकडून सर्वेक्षण करु न त्यांना मानधन सुरू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.- काशिनाथ खराटे, लोककलावंत, निरगुडे ता. पेठ पेठ तालुक्याचा दौरा करत असतांना अनेक गावांमध्ये आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यायासाठी प्रयत्न करणारे कलावंत भेटत असतात. अशा कलावंतांना शासनाकडून योग्य मानधन मिळवून देण्यासाठी संबंधित शासकिय यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू केला असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने अशा प्रकारच्या तळागाळात वास्तव्यास असलेल्या लोक कलाकारांची सुची तयार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.- हरिशंद्र चव्हाण,खासदारदिंडोरी लोकसभा