शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खासदारांच्या निवासस्थानी लोकगीतांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:01 IST

पेठ : महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.

ठळक मुद्देमानधनासाठी साकडे : आदिवासी लोक कलाकारांचे अनोखे गाºहाणे

पेठ :  महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.पेठ तालुक्यातील बहुतांश गावात पारंपारिक आदिवासी वाद्य, गीते व नृत्य करणारे कलापथक आहेत. पातळी, धाब्याचापाडा येथील आदिवासी कलापथकांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. मात्र एकीकडे आदिवासी संस्कृतीचे जतन करत असतांना यासाठी लागणारे साहित्य खरेदी, प्रवासासाठी लागणारा खर्च व जाणारा वेळ यामुळे लोककलावंताच्या कुटुंबात आर्थिक कुंचबना होतांना दिसून येत आहे. शिवाय वयाच्या साठीनंतर अशा कलावंतांना परावलंबी जीवन जगावे लागत असल्याने किमान पोटाची खळगी भरण्याइतपत शासनाने मानधन द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. बहुतांश कलावंत हे गावोगाव विखुरलेले असल्याने त्यांचे संघटन होऊ शकत नाही. शासन दरबारी दुर्लक्षति राहिलेल्या या कलावंतानी आपल्या ढोलकी तुणतुण्यासह थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाशिकिस्थत निवासस्थान गाठले. आपली मागणी शासन दरबारी पोहचवण्याची विनंती करतांना चव्हाण यांच्या इच्छेरून पारंपारिक लोकगीतांचा जागर घालण्यात आला. आतातरी शासन या कलावंताना मानधन सुरू करेल का ? असा सवाल उपस्थित कलाकारांच्या मनात आहे.आदिवासी लोककलावंताना मानधन सुरू करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.पेठ -सुरगाणा तालुक्यात विविध धार्मिक व पारंपारिक उत्सवाच्या निमित्ताने अशिक्षति लोककलावंत गावोगाव फिरून लोककला सादर करत असतांना उतारवयात अशा कलावंतांना आर्थिक कुंचबना सहन करावी लागते. तरी शासनाने अशा दुर्लक्षति लोककलावंतांचे स्वतंत्र यंत्रणेकडून सर्वेक्षण करु न त्यांना मानधन सुरू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.- काशिनाथ खराटे, लोककलावंत, निरगुडे ता. पेठ पेठ तालुक्याचा दौरा करत असतांना अनेक गावांमध्ये आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यायासाठी प्रयत्न करणारे कलावंत भेटत असतात. अशा कलावंतांना शासनाकडून योग्य मानधन मिळवून देण्यासाठी संबंधित शासकिय यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू केला असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने अशा प्रकारच्या तळागाळात वास्तव्यास असलेल्या लोक कलाकारांची सुची तयार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.- हरिशंद्र चव्हाण,खासदारदिंडोरी लोकसभा