शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चारा-पाणीटंचाईने शेतकरी हतबल

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

दुष्काळाची परंपरा : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात टॅँकरच्या फेऱ्या

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण चारा, पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा टँकर तरी दररोज दोन वेळा द्या, अशी मागणी राजापूर, ममदापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिसरात गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती असून, एकही मोठे धरण नाही किंवा पाणीपुरवठा योजनाही भागात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राजापूर येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या वरती असून, येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आणि तोही दररोज येत नाही तसेच ममदापूर येथील सहा हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून, याठिकाणी दोन-तीन दिवसांनंतर टँकर येतो तसेच वाडीवस्त्यांवर आठ ते दहा दिवसात एकाच वेळी पिण्याच्या पाण्याचा टँकर येत आहे. त्यामुळे पाणी माणसाला ठेवावे की जनावरांना पाजावे, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. सध्या सगळ्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. जनावरांसह माणसांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. ममदापूर येथे पाणीपुरवठा करणारे टँकर आठ-दहा दिवस वाडीवस्त्यांवर येत नाही आणि आले तर दोन टाक्यांच्या वर पाणी मिळत नाही मग ते पुरणार तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. तशाच प्रकारे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असून, चारा संपला आहे. निफाड तालुक्यातील उसावर जगलेल्या जनावरांना उपासमारीची वेळ आली आहे. कारण सुरुवातीला दोन हजार रुपये टन असलेला ऊस आज चार हजार रु पये टन झाला आहे. पाऊस लांबल्याने उसाचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, उसनवारी हे सगळे प्रकार करून पैसा संपल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने जनावरांच्या चाऱ्याचा व पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसाच इतके दिवस घरच्या शेतातील काही शेजारच्या जिल्ह्यातील मिळेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून चारा घेऊन तो आत्तापर्यंत कसाबसा पुरला; परंतु सध्या चाऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की एक दोन वैरण कशीबशी टाकून अर्धपोटी जनावरे शेतकरी सांभाळत आहेत. (वार्ताहर)