शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

चारा-पाणीटंचाईने शेतकरी हतबल

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

दुष्काळाची परंपरा : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात टॅँकरच्या फेऱ्या

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण चारा, पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा टँकर तरी दररोज दोन वेळा द्या, अशी मागणी राजापूर, ममदापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिसरात गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती असून, एकही मोठे धरण नाही किंवा पाणीपुरवठा योजनाही भागात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राजापूर येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या वरती असून, येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आणि तोही दररोज येत नाही तसेच ममदापूर येथील सहा हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून, याठिकाणी दोन-तीन दिवसांनंतर टँकर येतो तसेच वाडीवस्त्यांवर आठ ते दहा दिवसात एकाच वेळी पिण्याच्या पाण्याचा टँकर येत आहे. त्यामुळे पाणी माणसाला ठेवावे की जनावरांना पाजावे, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. सध्या सगळ्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. जनावरांसह माणसांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. ममदापूर येथे पाणीपुरवठा करणारे टँकर आठ-दहा दिवस वाडीवस्त्यांवर येत नाही आणि आले तर दोन टाक्यांच्या वर पाणी मिळत नाही मग ते पुरणार तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. तशाच प्रकारे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असून, चारा संपला आहे. निफाड तालुक्यातील उसावर जगलेल्या जनावरांना उपासमारीची वेळ आली आहे. कारण सुरुवातीला दोन हजार रुपये टन असलेला ऊस आज चार हजार रु पये टन झाला आहे. पाऊस लांबल्याने उसाचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, उसनवारी हे सगळे प्रकार करून पैसा संपल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने जनावरांच्या चाऱ्याचा व पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसाच इतके दिवस घरच्या शेतातील काही शेजारच्या जिल्ह्यातील मिळेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून चारा घेऊन तो आत्तापर्यंत कसाबसा पुरला; परंतु सध्या चाऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की एक दोन वैरण कशीबशी टाकून अर्धपोटी जनावरे शेतकरी सांभाळत आहेत. (वार्ताहर)