शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

चारा-पाणीटंचाईने शेतकरी हतबल

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

दुष्काळाची परंपरा : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात टॅँकरच्या फेऱ्या

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण चारा, पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा टँकर तरी दररोज दोन वेळा द्या, अशी मागणी राजापूर, ममदापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिसरात गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती असून, एकही मोठे धरण नाही किंवा पाणीपुरवठा योजनाही भागात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राजापूर येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या वरती असून, येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आणि तोही दररोज येत नाही तसेच ममदापूर येथील सहा हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून, याठिकाणी दोन-तीन दिवसांनंतर टँकर येतो तसेच वाडीवस्त्यांवर आठ ते दहा दिवसात एकाच वेळी पिण्याच्या पाण्याचा टँकर येत आहे. त्यामुळे पाणी माणसाला ठेवावे की जनावरांना पाजावे, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. सध्या सगळ्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. जनावरांसह माणसांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. ममदापूर येथे पाणीपुरवठा करणारे टँकर आठ-दहा दिवस वाडीवस्त्यांवर येत नाही आणि आले तर दोन टाक्यांच्या वर पाणी मिळत नाही मग ते पुरणार तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. तशाच प्रकारे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असून, चारा संपला आहे. निफाड तालुक्यातील उसावर जगलेल्या जनावरांना उपासमारीची वेळ आली आहे. कारण सुरुवातीला दोन हजार रुपये टन असलेला ऊस आज चार हजार रु पये टन झाला आहे. पाऊस लांबल्याने उसाचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, उसनवारी हे सगळे प्रकार करून पैसा संपल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने जनावरांच्या चाऱ्याचा व पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसाच इतके दिवस घरच्या शेतातील काही शेजारच्या जिल्ह्यातील मिळेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून चारा घेऊन तो आत्तापर्यंत कसाबसा पुरला; परंतु सध्या चाऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की एक दोन वैरण कशीबशी टाकून अर्धपोटी जनावरे शेतकरी सांभाळत आहेत. (वार्ताहर)