शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट

By admin | Updated: October 10, 2015 22:06 IST

दुष्काळ : पिके करपली; डाळींबबागा उखडल्या; जनावरांची उपासमार

पिंपळगाव वाखारी : दुष्काळामुळे परिसरात चाराटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर उपाययोजना म्हणून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागवली होती, परंतु याला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही अद्याप कुठलीही कार्यवाही नसल्याने मागवलेली माहिती निव्वळ फार्स ठरण्याची चर्चा पशुपालक व शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.पाण्याअभावी खरिपातील सर्वच पिके करपली आहेत. जनावरांसाठी चाराटंचाईचे भीषण संकट शेतकरीवर्गासमोर उभे राहिले आहे. याबाबत गावस्तरावर चारा छावणी तयार करून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रत्येक दुष्काळग्रस्त गावातून शेतकऱ्यांची दुभत्या व खाटे जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागविली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आपली माहिती अर्जांद्वारे गाव पातळीवर तलाठ्याकडे दिली; परंतु अद्याप शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही नाही. दिवसेंदिवस चाराटंचाईचे संकट वाढत असून, शासन यंत्रणा मात्र सुस्त आहे. मागवलेले अर्ज हे निव्वळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा पशुपालक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.डाळींब परिसरातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाला तेल्यारोगाचे ग्रहण लागले. तेल्याचे आक्रमण रोखताना डाळींब उत्पादकांच्या नाकीनऊ आले. काही शेतकरी त्यापासून बचाव करत थोडेफार उत्पादन घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना तेल्याचे आक्रमण रोखणे अशक्य झाल्याने खर्च अधिक व उत्पादनशून्य अशी अवस्था झाली. त्यामुळे अनेकांनी डाळींबबागा उखडून टाकल्या आहेत. सध्या परिसरात डाळींबबागांवर तेल्याबरोबर प्लेग रोगाचे आक्रमण झाले असून, तयार फळे गळून पडत आहे. यामुळे फळांचे मोठे नुकसान होत असल्याने डाळींब उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)

डाळिंबावर प्लेगचे सावट

पिंपळगाव वाखारी : परिसरातील डाळींबबागांना तेल्या रोगाच्या आक्रमणाबरोबर आता प्लेग रोगाचेही आक्रमण सहन करावे लागत आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक धास्तावले आहेत. अनेक डाळींब उत्पादकांना त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक करण्याची वेळ आल्याने बहुतेक शेतकरी डाळींब बागांना रामराम करण्याच्या तयारीला लागले आहेत.

रब्बीच्या आशा धूसरपिंपळगाव वाखारी : परिसरात पाण्याअभावी रब्बीच्या आशा मावळल्याने शेतकरीवर्गामध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. यंदा खरिपाबरोबर रब्बीही हातातून निसटत असल्याने परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.पाऊस न पडल्याने परिसरात यंदा भीषण दुष्काळीस्थिती आहे. खरिपाची संपूर्ण पिके करपून वाया गेली आहेत. परतीचा पाऊस समाधानकारक बरसल्यास रब्बी होईल या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे परिसरात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. शेतकरीवर्गात खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेल्याने कमालीची अस्वस्था वाढली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.