शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाजारात दरवळला फु लांचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:46 IST

गणेशोत्सवाला गुरुपासून (दि.१३) प्रारंभ झाला असून, गणेश स्थापनेच्या दिवशी गणरायांच्या पूजेसाठी व सजावटीसाठी सुगंधी फुलांना गणेशभक्तींनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले.

ठळक मुद्देउत्सव : पूजा, सजावटीसाठी मागणीत वाढआवक नसल्यानेच भाव वधारले

नाशिक : गणेशोत्सवाला गुरुपासून (दि.१३) प्रारंभ झाला असून, गणेश स्थापनेच्या दिवशी गणरायांच्या पूजेसाठी व सजावटीसाठी सुगंधी फुलांना गणेशभक्तींनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले. नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असलने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. गौरी-गणपतीच्या काळात सजावटीला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने गणेशचतुर्थीपासूनच सुगंधी फुलांची मागणी वाढते. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला होता.बाजारात कापडाची कुत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सवांमध्ये खऱ्या फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्या दिसून आले.गणेशपूजेसाठी शेवंती, अ‍ॅस्टर, गुलाबासह नियमित झेंडू, मोगरा, निशिगंधा या फुलांसह व्यावसायिकांनी ज्वास्वंदीची फुले आवर्जन उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. जास्वंद हे गणपत्ती बाप्पाचे आवडते फूल असल्याने या फुलला गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मागणी अते. रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळाले. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.