शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

ध्वजारोहणाची दोरी प्रशासकांच्या हातीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:14 IST

गेल्या वर्षीच मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या ...

गेल्या वर्षीच मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. तत्पूर्वी गाव पातळीवरील विकासकामे रखडू नयेत म्हणून गेल्यावर्षी जुलै महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्यापही हे प्रशासक ग्रामपंचायतींवर कायम आहेत. दरम्यान, नुकत्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्याने प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार याविषयी उत्सुकता असली तरी, अजूनही निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड झालेली नाही. येत्या २८ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येऊन त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सरपंचाची निवड केली जाईल व त्यानंतर सदस्यांचे सदस्यत्व गृहीत धरले जाणार अहे. ही सारी प्रक्रिया प्रजासत्ताक दिनानंतरच पार पाडली जाणार असल्याने तूर्त ग्रामपंचायतींच्या प्रशासकांनाच ध्वजारोहण करण्याचा मान कायम राहणार आहे.