शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ध्वजारोहणाची दोरी प्रशासकांच्या हातीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:14 IST

गेल्या वर्षीच मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या ...

गेल्या वर्षीच मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. तत्पूर्वी गाव पातळीवरील विकासकामे रखडू नयेत म्हणून गेल्यावर्षी जुलै महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्यापही हे प्रशासक ग्रामपंचायतींवर कायम आहेत. दरम्यान, नुकत्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्याने प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार याविषयी उत्सुकता असली तरी, अजूनही निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड झालेली नाही. येत्या २८ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येऊन त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सरपंचाची निवड केली जाईल व त्यानंतर सदस्यांचे सदस्यत्व गृहीत धरले जाणार अहे. ही सारी प्रक्रिया प्रजासत्ताक दिनानंतरच पार पाडली जाणार असल्याने तूर्त ग्रामपंचायतींच्या प्रशासकांनाच ध्वजारोहण करण्याचा मान कायम राहणार आहे.