शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदत वाढ

By admin | Updated: April 6, 2017 00:18 IST

लासलगाव/येवला : भारतातून निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेस येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 लासलगाव/येवला : भारतातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी व निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेस येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेंतर्गत निर्यातदारांनी पाठविलेल्या कांद्यास पाच टक्के अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाने यापूर्वी निर्णय घेतलेला आहे. मात्र सदर योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपली होती. त्यानंतर केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने दि. ३० डिसेंबर, २०१६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सदर योजनेस दि. ३१ मार्च, २०१७पर्यंत मुदतवाढ दिली होती.सदर योजनेमुळे कांदा निर्यातीस प्रोत्साहन मिळून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रमाणात कांद्याची निर्यात झाली. मात्र योजनेची वाढीव मुदत दि. ३१ मार्च संपुष्टात आल्याने केंद्र शासनाने सदर योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने सभापती जयदत्त होळकर यांनी केली होती. तसेच मुदतवाढ न दिल्यास त्याचा कांदा निर्यातीवर परिणाम होऊन पर्यायाने कांदा दरात अजून घसरण होण्याची शक्यता असल्याने बाजार समितीने सदर योजनेस जास्त कालावधीसाठी मुदतवाढ द्यावी तसेच अनुदान रकमेत वाढ करावी, अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे केली होती. (लोकमत ब्युरो)