शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

By admin | Updated: November 7, 2015 23:23 IST

पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

सिडको : येथील पवननगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या तीन-चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर मनपा प्रशासनाने सदर व्हॉल्व्ह तातडीने दुरुस्त केला.महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार सातत्याने घडत असतो. तसेच अनेक ठिकाणच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जाणे, याबरोबरच पाइपलाइन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकारही कायमच घडत असतात, परंतु यानंतरही मनपा अधिकारी मात्र याकडे डोळेझाक कारीत असल्याचे या आधीही उघड झाले आहे. पवननगर ते रायगड चौकदरम्यान हरिष हार्डवेअरसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या चेंबरमधील व्हॉल्व्ह गेल्या तीन दिवसांपासून खराब झाल्याने यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत शिवसेनेचे माजी सिडको उप विभागप्रमुख किरण शिंदे यांनी पाठपुरावा केला सिडकोतील मनपा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही भागांत कमी दाबाने तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा केला जातो. यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्या भागात प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो त्या भागातील गल्लीबोळातील रस्त्यांवर सकाळच्या सुमारास पाण्याचा सडाच पडलेला दिसतो. याबाबतही महापौरांनी पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. एकूणच सिडको भागात पाणीपुरवठ्याबाबत नियोजन नसल्याने व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय यापुढेही होऊ शकतो. सिडकोतील सर्व नागरिकांना समसमान व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी व सिडकोतील कायमच होत असलेल्या पाणी गळतीवर नियंत्रण आणण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)