शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहर, जिल्'ातील विविध अपघातात पाच जण ठार

By admin | Updated: May 17, 2015 01:37 IST

शहर, जिल्'ातील विविध अपघातात पाच जण ठार

  नाशिक : शहर परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ मखमलाबाद रोडवरील कोठुळे मळा परिसरात बिगारी काम करीत असताना चक्कर येऊन पडल्याने सुरेश रमेश मिसाळ (२२) या युवकास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ खेरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ दुसरी घटना फुलेनगर परिसरातील श्रीराम झोपडपट्टीसमोर घडली़ बेबी सुभाष वानखेडे ही महिला आपल्या राहत्या घरी ४० टक्के भाजल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला़ या दोन्ही घटनांची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तिसरी घटना पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात घडली़ पुतण्याच्या विवाहासाठी आलेले सिन्नर येथील महेश त्र्यंबक खेडलेकर (३७) हे चक्कर येऊन पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ पाटील यांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ चौथी घटना वणी-सापुतारा रोडवर घडली़ दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील चिंधू विठोबा वटाणे (४२) हे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते़ एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर झाले़ त्यांना १०८ अ‍ॅम्बुलन्सकारने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाचवी घटना मनमाडजवळील कुंदलगाव येथे घडली़ देवळा तालुक्यातील कुंभार्डे येथील रहिवासी एकनाथ त्र्यंबक ठाकरे (५५) हे शुक्रवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने प्रथम मालेगाव येथील खासगी रुग्णालय व नंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)