शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

ंमनमाडला दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यूमनमाड : गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली. उत्सवाला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पोलीस बंदोबस्तात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.येथील इदगाह भागात असलेल्या गणराज गणेश मंडळासमोर शनिवारी रात्री विविध कार्यक्रम सुरू होते. नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह १३ जणांनी या ठिकाणी येत येथे उभ्या असलेल्या राहुल कन्हैयालाल चुनियान (१७) यास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत चाकू व कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मृताचा भाऊ शुभम चुनियान याने मनमाड पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी संशयित अमिन कासम शेख (पटेल), जाकीर शेख, मतीत गुलाम शहा, सद्दाम बादशहा अत्तार, असीफ पटेल, सोहेल जाकीर शेख, अरबाज, जाबाज, रज्जू (तिघांची पुर्ण नावे माहीत नाही), लाला पटेल, समील रफीक पठाण, सोहेब उर्फ मोन्या जाकीर शेख व अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या गटाकडून अमिन कासम शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चुनियान, योगेश रतन चुनियान, शुभम कन्हैयालाल चुनियान, प्रकाश दिलीप खडांगळे, ललित मनीष पाठक, संदीप मधुकर कांबळे, सोनू मंगवाना, संजय चिंडालीया व अन्य आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन हे रात्रीपासूनच शहरात तळ ठोकून आहेत. रुगणालयात पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी, निरीक्षक भागवत सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव, कळवण येथील पोलीस कुमक व राज्य राखीव दलाच्या जवानाच्या तुकड्यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृत राहुल याचा मृतदेह बंदोबस्तात निवास्थानी नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाइकांनी शवविच्छेदन अहवाल व एफआयआर प्रत मिळाल्या शिवाय अंत्ययात्रा काढणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)