शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

ंमनमाडला दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यूमनमाड : गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली. उत्सवाला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पोलीस बंदोबस्तात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.येथील इदगाह भागात असलेल्या गणराज गणेश मंडळासमोर शनिवारी रात्री विविध कार्यक्रम सुरू होते. नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह १३ जणांनी या ठिकाणी येत येथे उभ्या असलेल्या राहुल कन्हैयालाल चुनियान (१७) यास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत चाकू व कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मृताचा भाऊ शुभम चुनियान याने मनमाड पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी संशयित अमिन कासम शेख (पटेल), जाकीर शेख, मतीत गुलाम शहा, सद्दाम बादशहा अत्तार, असीफ पटेल, सोहेल जाकीर शेख, अरबाज, जाबाज, रज्जू (तिघांची पुर्ण नावे माहीत नाही), लाला पटेल, समील रफीक पठाण, सोहेब उर्फ मोन्या जाकीर शेख व अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या गटाकडून अमिन कासम शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चुनियान, योगेश रतन चुनियान, शुभम कन्हैयालाल चुनियान, प्रकाश दिलीप खडांगळे, ललित मनीष पाठक, संदीप मधुकर कांबळे, सोनू मंगवाना, संजय चिंडालीया व अन्य आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन हे रात्रीपासूनच शहरात तळ ठोकून आहेत. रुगणालयात पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी, निरीक्षक भागवत सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव, कळवण येथील पोलीस कुमक व राज्य राखीव दलाच्या जवानाच्या तुकड्यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृत राहुल याचा मृतदेह बंदोबस्तात निवास्थानी नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाइकांनी शवविच्छेदन अहवाल व एफआयआर प्रत मिळाल्या शिवाय अंत्ययात्रा काढणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)