शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मत्स्यव्यवसायाने आदिवासींचे स्थलांतर थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे.

ठळक मुद्देयुवकांना मिळाला रोजगार : देवदरी पाझर तलावात सोडले मत्स्यबीज

येवला : वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे.तालुक्यातील पूर्व भागात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यातील आदिवासी बांधवांचे रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी मत्स्य व्यवसायाला चालनादिली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून आदिवासींचे स्थलांतर थांबलेच; परंतु स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाल्याने हाती जास्तीचे चार पैस मिळू लागले आहेत. याबरोबरच या कष्टकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्नही सुटला आहे. पूर्व भागातील पाझर तलावांमध्ये दरवर्षी या काळात आदिवासी कष्टकरी तरुण मत्स्यबीज सोडतात. तयार झालेले मासे पकडणे व विक्र ी करणे यातून चांगले पैसेही मिळतात. खवय्यांना ताजे मासे उपलब्ध होत आहे. यावर्षी तालुक्यातील १० पाझर तलावांमध्ये ४ लाख ८० हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. देवदरी येथील पाझर तलावात पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते मत्स्यबीज सोडण्यात आले. खरवंडीचे सरपंच दशरथ मोरे, पोलीसपाटील भास्कर दाणे, ज्ञानेश्वर मोरे, बहिरू मोरे, विठ्ठल हंबरे, भाऊसाहेब गोदावरे, पोलीसपाटील बाळू मोरे, विष्णू मोरे आदी उपस्थित होते.

येवला तालुक्यात मोठ्या संख्येने शेततळे आहेत. या शेततळ्यातसुद्धा शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करू शकतात. शेततळ्यात होणारे शेवाळ हे माशांचे खाद्य आहे. यातून शेततळे स्वच्छ राहील व मत्स्यव्यवसायातून उत्पन्नही मिळेल. यासाठी मत्स्यबीज तलावात सोडले आहे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती

टॅग्स :fishermanमच्छीमारpanchayat samitiपंचायत समिती