शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मत्स्यव्यवसायाने आदिवासींचे स्थलांतर थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे.

ठळक मुद्देयुवकांना मिळाला रोजगार : देवदरी पाझर तलावात सोडले मत्स्यबीज

येवला : वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे.तालुक्यातील पूर्व भागात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यातील आदिवासी बांधवांचे रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी मत्स्य व्यवसायाला चालनादिली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून आदिवासींचे स्थलांतर थांबलेच; परंतु स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाल्याने हाती जास्तीचे चार पैस मिळू लागले आहेत. याबरोबरच या कष्टकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्नही सुटला आहे. पूर्व भागातील पाझर तलावांमध्ये दरवर्षी या काळात आदिवासी कष्टकरी तरुण मत्स्यबीज सोडतात. तयार झालेले मासे पकडणे व विक्र ी करणे यातून चांगले पैसेही मिळतात. खवय्यांना ताजे मासे उपलब्ध होत आहे. यावर्षी तालुक्यातील १० पाझर तलावांमध्ये ४ लाख ८० हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. देवदरी येथील पाझर तलावात पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते मत्स्यबीज सोडण्यात आले. खरवंडीचे सरपंच दशरथ मोरे, पोलीसपाटील भास्कर दाणे, ज्ञानेश्वर मोरे, बहिरू मोरे, विठ्ठल हंबरे, भाऊसाहेब गोदावरे, पोलीसपाटील बाळू मोरे, विष्णू मोरे आदी उपस्थित होते.

येवला तालुक्यात मोठ्या संख्येने शेततळे आहेत. या शेततळ्यातसुद्धा शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करू शकतात. शेततळ्यात होणारे शेवाळ हे माशांचे खाद्य आहे. यातून शेततळे स्वच्छ राहील व मत्स्यव्यवसायातून उत्पन्नही मिळेल. यासाठी मत्स्यबीज तलावात सोडले आहे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती

टॅग्स :fishermanमच्छीमारpanchayat samitiपंचायत समिती