शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन जानेवारीत

By admin | Updated: October 10, 2016 01:15 IST

अभिमन्यू टकले : सोलापुरात रंगणार सारस्वतांचा मेळा

नाशिक : महाराष्ट्रात १८ ते १९ टक्के धगनर समाज असून, समाजाला इतिहास, कला, नृत्य, ओव्या, साहित्य, संस्कृती अशी संपन्न आणि समृद्ध परंपरा आहे. मात्र, राज्यभरात विखुरलेल्या या समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळात एकही साहित्य संमेलन झालेले नाही. त्यामुळे समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने सोलापूरमध्ये पुढील वर्षात प्रथम आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर बहुउद्देशीय नाट्यगृहात ७ व ८ जानेवारी २०१७ या कालावधीत दोन दिवसीय संमेलन पार पडणार असून, उद्घाटन व समारोपाचा कार्यक्रम खुल्या मैदानावर होणार आहे. धनगर समाज साहित्य, संस्कृती, इतिहास आदि विषयांवर लेखन करणाऱ्या सर्व जातीधर्माच्या साहित्यिकांसाठी संमेलनाचे व्यासपीठ खुले असल्याचे आयोजकांनी सांगितले. धनगर समाजावर लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा संमेलनात पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच आदिवाशी धनगर समाज साहित्यावर शिर्षकगीत ध्वनीफित तयार करणाऱ्या कवी, गीतकार यांना ५१ हजार रुपयांचे, तर ध्वनीचित्रफित शिर्षक गीत तयार करणारास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. गीत निवडीचे अधिकार संयोजन समितीकडे राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनात समाजाच्या साहित्य, इतिहास, संस्कृती, शिक्षण, उद्योग, माध्यमे, आरक्षण, राजकारण, युवा महिला व नोकरदार आदि विषयांवर चर्चासत्र होणार असून, संमेलनाचे दोन दिवस बौद्धिक, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. (प्रतिनिधी)