शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:45 IST

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबालभारतीकडून पुरवठा महापालिकेच्या केंद्रात मात्र पुस्तके पडून

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.इयत्ता पहिलीच्या बदलेल्या अभ्यासक्रमामुळे शाळांना १५ जूनपूर्वी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होऊ शकला नसल्याने पहिलीच्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळालीच नाही. मात्र शाळा सुरू झाल्यानंतरही पहिलीचे विद्यार्थी अजूनही पुस्तकांपासून वंचित आहेत. पहिलीच्या अभ्यासक्रमाची तीन पुस्तके असून, काही शाळांना एक, तर काही शाळांना दोन पुस्तके मिळाली आहेत. सिडकोतील काही शाळांना तीनही पुस्तकांचा पुरवठा झाल्याचे सांगितले जाते. मात्र शहरातील अन्य भागातील शाळांना अजूनही पुरेसा पुरवठा झाला नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अजूनही वंचित राहिले आहेत.बालभारतीकडून होणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा महापालिकेच्या भालेकर शाळेतील केंद्रात होतो. येथून मनपा हद्दीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जातो. बालभारतीकडून महापालिका हद्दीतील शाळांनी मागणी केल्यानुसार सुमारे ६ लाख ३७ हजार ८ पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते आठवीच्या वर्गांना सुमारे २८ लाख ६५ हजार ४२२ याप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे.पाठ्यपुस्तकांप्रमाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या केंद्रामध्ये तर जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये पाठ्यपुस्तके जमा होऊन तेथून ती शाळांना मागणीपत्राप्रमाणे वितरित केली जातात. बालभारतीने दिलेल्या आकडेवारीवरून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. असे असतानाही पहिलीच्या मुलांना मात्र अजूनही पुस्तके मिळाली नसल्याचे मुख्याध्यापकांकडूनच सांगितले जात आहे.