शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पहिल्याच पावसात रस्त्यांची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:51 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचे हाल : धानोरे, रूईतील वाहनचालक त्रस्त

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार परिसरातून मागणी होऊनदेखील सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथून प्रवास करणारे शेतकरी, विद्यार्थी, रहिवासी हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची वेळीच दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्यांचे स्वरूप पाण्याच्या तळ्यांमध्ये झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका वादळी पावसामध्ये रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या दीड ते दोन फुटांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.सदरच्या रस्त्याने हजारो शेतकरी विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतमाल विक्र ीसाठी नेत असतात. रस्त्याची अवस्था पाहिली असता तेथून वाहन न्यावे की नाही, असा प्रश्न चालकांपुढे पडतो. नादुरु स्त रस्त्यांमुळे परिसरामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच होत आहे. या भागातील रस्ते मृत्यूचा सापळा तर होणार नाही नाही ना, असा प्रश्न तेथील रहिवाशी व प्रवाशांना पडत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकवेळा लेखी तक्र ारी केल्या आहेत. परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रोज प्रवास करणारे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती, रहिवाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरु स्तीसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ रस्त्यातील मोठे खड्डे बुजवून परिसरातील नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.