शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रस्त्यांची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:51 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचे हाल : धानोरे, रूईतील वाहनचालक त्रस्त

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार परिसरातून मागणी होऊनदेखील सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथून प्रवास करणारे शेतकरी, विद्यार्थी, रहिवासी हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची वेळीच दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्यांचे स्वरूप पाण्याच्या तळ्यांमध्ये झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका वादळी पावसामध्ये रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या दीड ते दोन फुटांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.सदरच्या रस्त्याने हजारो शेतकरी विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतमाल विक्र ीसाठी नेत असतात. रस्त्याची अवस्था पाहिली असता तेथून वाहन न्यावे की नाही, असा प्रश्न चालकांपुढे पडतो. नादुरु स्त रस्त्यांमुळे परिसरामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच होत आहे. या भागातील रस्ते मृत्यूचा सापळा तर होणार नाही नाही ना, असा प्रश्न तेथील रहिवाशी व प्रवाशांना पडत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकवेळा लेखी तक्र ारी केल्या आहेत. परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रोज प्रवास करणारे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती, रहिवाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरु स्तीसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ रस्त्यातील मोठे खड्डे बुजवून परिसरातील नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.