शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आधी लग्न रायबाचे.. मग कोंढाण्याचे...

By admin | Updated: October 3, 2015 00:12 IST

अजब सरकार : ना पद निर्मिती, ना नोकर भरती फक्त निवडणुकीची घाई

नाशिक : राज्यातील २४ जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी घेण्यात येत असलेली निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन आणखी एक महिन्यानी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांकडून नगरपंचायतीचा पदभारही स्वीकारला जाणार असला तरी, प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ पाहणाऱ्या नगरपंचायतींची अवस्था मात्र ग्रामपंचायतींसारखीच राहील यात तिळमात्र शंका नाही. कारण नगरपंचायतीचा कारभार हाकण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सरकारलाच विसर पडला असून, त्या करण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याचा प्रकार म्हणजे ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ ऐवजी ‘रायबाचे’ असेच म्हणावे लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे आघाडी सरकारच्या काळातच मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेऊन विद्यमान सरकारने त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.येत्या महिन्यात या नगरपंचायतींचा कारभार नव नियुक्त लोकप्रतिनिधींच्या हाती बहुधा सोपविलाही जाईल परंतु हे करत असताना सरकारने निव्वळ कमालीची राजकीय घाई चालविल्याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. मोठ्या म्हणून गणल्या गेलेल्या व सध्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने एक छदामही नगरपालिका विभागाला उपलब्ध करून दिलेला नाही, उलट ग्रामपंचायतींमध्ये शिल्लक असलेल्या रकमेतून निवडणूक खर्च भागविण्याची सूचना करण्यात आलेली असून, ज्या ग्रामपंचायती सधन आहेत, त्यांच्या निवडणूक खर्चासाठी तजवीज होऊ शकलेली आहे; मात्र आदिवासी भागातील ग्रामपंचायतींमध्ये नाममात्र घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याची भ्रांत असल्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकांसाठी येणारा लाखोंचा खर्च कसा भागवावा असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. शिवाय शिल्लक असलेला निधी निवडणुकीवर उधळल्यानंतर नगरपंचायतीतील रहिवाश्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्नही या अधिकाऱ्यांना भेडसावू लागला आहे. नगरपंचायतींमध्ये रूपांतर झालेल्या ग्रामपंचायतींचा पदभार सध्या अध्यक्ष म्हणून तालुका तहसीलदारांकडे सोपविण्यात आलेला असून, व्यवस्थापक म्हणून शासनाने तीन महिन्यांपूर्वी काही नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविला होता, परंतु त्यापैकी एकाही मुख्याधिकाऱ्याने ग्रामपंचायतींना हजेरी लावून अस्तित्वात येणाऱ्या नगरपंचायतीच्या कारभाराविषयी व्यवस्था केलेली नाही. उलट प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची सेवाही ग्रामविकास खात्याने आपल्याकडे वर्ग करून घेत ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने भरलेल्या अल्पशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींचा कारभार हाकला जात असून, अस्तित्वात येणाऱ्या नवीन नगरपंचायतींच्या कायद्यानुसार कोणत्या कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घ्यायची असा प्रश्नही निर्माण झाला आहे. ना पदांची निर्मिती ना नोकर भरती, ना मुख्याधिकारी, ना आरोग्याधिकारी, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबरोबरच जन्ममृत्यूची नोंद व स्वच्छता, पाणीपुरवठ्याबरोबर अग्निशमन दलाचीही वानवा आहे. पदाधिकाऱ्यांना दालन नाही, सदस्यांना सभागृह नाही, वीज, स्वच्छतागृहाचा तर पत्ताच नाही अशा एक नव्हे तर अनेक समस्यांचा डोंगर या अस्तित्वात येऊ पाहणाऱ्या नगरपंचायतींसमोर उभा आहे, त्यामुळे लोकशाहीमार्गाने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी हाती सत्ता घेतली तरी, नगरपंचायतींची अवस्था ग्रामपंचायतींसारखीच राहील अशी परिस्थिती आहे.