शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

By admin | Updated: April 3, 2015 01:46 IST

जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

नाशिक : राजकारणात कोणतीही आश्वासने देऊन सत्तेवर येणे सोपे असते, मात्र पूर्ण करणे किती अवघड असते, हे आजच्या राज्य व केंद्रातील सरकारला आता कळाले असेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.येथील रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बाळासाहेब थोरात यांनी, ‘राज्यातील आजवर झालेले मुख्यमंत्री व त्यांच्या पुढील आव्हाने’ या विषयावर मुक्तचिंतन व्याख्यान दिले. बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाणांपासून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या स्वभावातील गुणवैशिष्ट्ये व त्यांच्या काळातील त्यांच्यापुढील आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात धरणे बांधण्यासाठी प्राधान्य दिले. शरद पवार यांना राज्याची दिशा माहीत होती आणि त्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून गाजले. त्यांच्या काळात गुंडगिरी मोडीत निघाली.वसंतदादा पाटील कमी शिकलेले, मात्र दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री होते.शिवाजीराव निलंगेकर, सुधाकर नाईक, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी त्या त्या काळातील आव्हाने सांगितली. आताच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा खूपच वाढवून ठेवल्या, मात्र त्या पूर्ण करणे किती अवघड आहे, याची प्रचिती त्यांना येत आहे, असे थोरात यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रवीण खाबिया, सुनील बुरड, मोहनलाल लोढा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)