शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

प्रवाशांची प्रथम पसंती : ग्रामीण भागात लोकप्रिय, नियमित निगराणीची गरज महामंडळासमोर ‘शाही’पणा राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST

ओझर : परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे.

ठळक मुद्देअथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजूलाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय

ओझर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत असून, प्रवासी खूश असले तरी या बसेसची इतर गाड्यांप्रमाणे दुरवस्था होऊ नये, या बसेसचा शाहीपणा टिकवायचा असल्यास त्यांची स्वच्छता, काळजी घेण्याचे आव्हान महामंडळापुढे आहे. एसटीचे रूप आतापर्यंत सामान्य माणसाने पाहिले. तिचं अथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजू आहे. सुरुवातीच्या काळात सुरू झालेला लाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. अनेक वर्षे बसचे एकच रूप पाहत आलेले प्रवासी बदलत्या काळानुसार लाल रंगाची बस, एशियाड, हिरकणी, शीतल, शिवनेरी आणि आताची शिवशाही इतक्या स्वरूपात सेवेत उतरली. परंतु सुरुवातीला अतिशय देखणी वाटणारी एसटी रस्त्यावरून चालता चालता इतक्या लवकर जीर्ण का होत जाते हा खरा अभ्यासाचा मुद्दा आहे. बहुतेक गाड्यांमध्ये चालकाच्या उजव्या पायाजवळ थुंकीचे थर दिसतात. तीच परिस्थिती बहुतेक सीटच्या पाठीमागील बाजूस कोपºयात दिसते. कुठे काच उघडत नाही. असे अनेक न पटणारे प्रकार प्रवासी सहन करत आहेत. सध्या कॉर्पोरेट जगात सर्वात लोकप्रिय प्रवासी साधन शिवशाही असल्याचे ठळकपणे दिसून येते आहे. अनेक प्रवासी चौकशी खिडकीवर प्रथम ‘शिवशाही’ बसला प्राधान्य देताना दिसतात. सदर बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. हिरकणीच्या दरात शिवशाहीचा थंडगार प्रवास म्हणजे पैसे वसूल हीच बहुतेकांची मानसिकता होताना दिसते आहे. पुणे, बोरिवली, औरंगाबाद, तुळजापूर, अहमदनगर, मुंबई, धुळे, नंदुरबार इत्यादी ठिकाणी चालणाºया बसेस चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची झालेली वाताहत सोडली तर प्रत्येक विभागाने ह्या बसेसची देखभाल-दुरुस्ती चोख ठेवण्याची गरज आहे. याची सुरुवात चालक-वाहक यांनी करण्याची गरज आहे. पान, तंबाखू खाणाºयांना मज्जाव केला पाहिजे. डेपोत गाडी जमा करताना देखरेख पथकाकडून पाहणी होणे गरजेचे आहे. आज सामान्य माणसाची हक्काची असणारी एसटी कॉर्पोरेट पेहराव घालत असताना, ती कायस्वरूपी कशी देखणी, सुंदर व सुदृढ राहील याची प्रत्येकाने काळजी घेतल्यास आपोआप प्रवाशांचा वाढता कल कायम राहील अन् एसटी खºया अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, हे निश्चित. शिवशाही बसने ग्रामीण भागातील स्थानकांत येण्याची गरज आहे. काही बसस्थानकांचा अपवादवगळता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मोठी लोकसंख्या असलेली कित्येक गावं आहेत, ज्यांना आदळआपट करतच प्रवास करावा लागतो. त्यांच्या नशिबी शाहीपणा कधी येणार, हा सामान्य नागरिकाला पडलेला मोठा प्रश्न सुटल्यास एसटीचे ‘अच्छे दिन’ कुणीही रोखू शकणार नाही, हे निश्चित.