शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

प्रवाशांची प्रथम पसंती : ग्रामीण भागात लोकप्रिय, नियमित निगराणीची गरज महामंडळासमोर ‘शाही’पणा राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST

ओझर : परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे.

ठळक मुद्देअथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजूलाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय

ओझर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत असून, प्रवासी खूश असले तरी या बसेसची इतर गाड्यांप्रमाणे दुरवस्था होऊ नये, या बसेसचा शाहीपणा टिकवायचा असल्यास त्यांची स्वच्छता, काळजी घेण्याचे आव्हान महामंडळापुढे आहे. एसटीचे रूप आतापर्यंत सामान्य माणसाने पाहिले. तिचं अथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजू आहे. सुरुवातीच्या काळात सुरू झालेला लाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. अनेक वर्षे बसचे एकच रूप पाहत आलेले प्रवासी बदलत्या काळानुसार लाल रंगाची बस, एशियाड, हिरकणी, शीतल, शिवनेरी आणि आताची शिवशाही इतक्या स्वरूपात सेवेत उतरली. परंतु सुरुवातीला अतिशय देखणी वाटणारी एसटी रस्त्यावरून चालता चालता इतक्या लवकर जीर्ण का होत जाते हा खरा अभ्यासाचा मुद्दा आहे. बहुतेक गाड्यांमध्ये चालकाच्या उजव्या पायाजवळ थुंकीचे थर दिसतात. तीच परिस्थिती बहुतेक सीटच्या पाठीमागील बाजूस कोपºयात दिसते. कुठे काच उघडत नाही. असे अनेक न पटणारे प्रकार प्रवासी सहन करत आहेत. सध्या कॉर्पोरेट जगात सर्वात लोकप्रिय प्रवासी साधन शिवशाही असल्याचे ठळकपणे दिसून येते आहे. अनेक प्रवासी चौकशी खिडकीवर प्रथम ‘शिवशाही’ बसला प्राधान्य देताना दिसतात. सदर बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. हिरकणीच्या दरात शिवशाहीचा थंडगार प्रवास म्हणजे पैसे वसूल हीच बहुतेकांची मानसिकता होताना दिसते आहे. पुणे, बोरिवली, औरंगाबाद, तुळजापूर, अहमदनगर, मुंबई, धुळे, नंदुरबार इत्यादी ठिकाणी चालणाºया बसेस चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची झालेली वाताहत सोडली तर प्रत्येक विभागाने ह्या बसेसची देखभाल-दुरुस्ती चोख ठेवण्याची गरज आहे. याची सुरुवात चालक-वाहक यांनी करण्याची गरज आहे. पान, तंबाखू खाणाºयांना मज्जाव केला पाहिजे. डेपोत गाडी जमा करताना देखरेख पथकाकडून पाहणी होणे गरजेचे आहे. आज सामान्य माणसाची हक्काची असणारी एसटी कॉर्पोरेट पेहराव घालत असताना, ती कायस्वरूपी कशी देखणी, सुंदर व सुदृढ राहील याची प्रत्येकाने काळजी घेतल्यास आपोआप प्रवाशांचा वाढता कल कायम राहील अन् एसटी खºया अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, हे निश्चित. शिवशाही बसने ग्रामीण भागातील स्थानकांत येण्याची गरज आहे. काही बसस्थानकांचा अपवादवगळता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मोठी लोकसंख्या असलेली कित्येक गावं आहेत, ज्यांना आदळआपट करतच प्रवास करावा लागतो. त्यांच्या नशिबी शाहीपणा कधी येणार, हा सामान्य नागरिकाला पडलेला मोठा प्रश्न सुटल्यास एसटीचे ‘अच्छे दिन’ कुणीही रोखू शकणार नाही, हे निश्चित.