शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची प्रथम पसंती : ग्रामीण भागात लोकप्रिय, नियमित निगराणीची गरज महामंडळासमोर ‘शाही’पणा राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST

ओझर : परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे.

ठळक मुद्देअथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजूलाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय

ओझर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सामील झालेल्या शिवशाही बसेस स्वस्तात मस्त मिळत असलेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत असून, प्रवासी खूश असले तरी या बसेसची इतर गाड्यांप्रमाणे दुरवस्था होऊ नये, या बसेसचा शाहीपणा टिकवायचा असल्यास त्यांची स्वच्छता, काळजी घेण्याचे आव्हान महामंडळापुढे आहे. एसटीचे रूप आतापर्यंत सामान्य माणसाने पाहिले. तिचं अथांग पसरलेलं जाळं ही सर्वात जमेची बाजू आहे. सुरुवातीच्या काळात सुरू झालेला लाल डबा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. अनेक वर्षे बसचे एकच रूप पाहत आलेले प्रवासी बदलत्या काळानुसार लाल रंगाची बस, एशियाड, हिरकणी, शीतल, शिवनेरी आणि आताची शिवशाही इतक्या स्वरूपात सेवेत उतरली. परंतु सुरुवातीला अतिशय देखणी वाटणारी एसटी रस्त्यावरून चालता चालता इतक्या लवकर जीर्ण का होत जाते हा खरा अभ्यासाचा मुद्दा आहे. बहुतेक गाड्यांमध्ये चालकाच्या उजव्या पायाजवळ थुंकीचे थर दिसतात. तीच परिस्थिती बहुतेक सीटच्या पाठीमागील बाजूस कोपºयात दिसते. कुठे काच उघडत नाही. असे अनेक न पटणारे प्रकार प्रवासी सहन करत आहेत. सध्या कॉर्पोरेट जगात सर्वात लोकप्रिय प्रवासी साधन शिवशाही असल्याचे ठळकपणे दिसून येते आहे. अनेक प्रवासी चौकशी खिडकीवर प्रथम ‘शिवशाही’ बसला प्राधान्य देताना दिसतात. सदर बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. हिरकणीच्या दरात शिवशाहीचा थंडगार प्रवास म्हणजे पैसे वसूल हीच बहुतेकांची मानसिकता होताना दिसते आहे. पुणे, बोरिवली, औरंगाबाद, तुळजापूर, अहमदनगर, मुंबई, धुळे, नंदुरबार इत्यादी ठिकाणी चालणाºया बसेस चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची झालेली वाताहत सोडली तर प्रत्येक विभागाने ह्या बसेसची देखभाल-दुरुस्ती चोख ठेवण्याची गरज आहे. याची सुरुवात चालक-वाहक यांनी करण्याची गरज आहे. पान, तंबाखू खाणाºयांना मज्जाव केला पाहिजे. डेपोत गाडी जमा करताना देखरेख पथकाकडून पाहणी होणे गरजेचे आहे. आज सामान्य माणसाची हक्काची असणारी एसटी कॉर्पोरेट पेहराव घालत असताना, ती कायस्वरूपी कशी देखणी, सुंदर व सुदृढ राहील याची प्रत्येकाने काळजी घेतल्यास आपोआप प्रवाशांचा वाढता कल कायम राहील अन् एसटी खºया अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, हे निश्चित. शिवशाही बसने ग्रामीण भागातील स्थानकांत येण्याची गरज आहे. काही बसस्थानकांचा अपवादवगळता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मोठी लोकसंख्या असलेली कित्येक गावं आहेत, ज्यांना आदळआपट करतच प्रवास करावा लागतो. त्यांच्या नशिबी शाहीपणा कधी येणार, हा सामान्य नागरिकाला पडलेला मोठा प्रश्न सुटल्यास एसटीचे ‘अच्छे दिन’ कुणीही रोखू शकणार नाही, हे निश्चित.