शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन

By admin | Updated: August 4, 2016 01:37 IST

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन

 नाशिक : मंगळवारी शहरात कोसळलेल्या पावसामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मर्यादा उघड झाल्या. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असूनही केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांचा उपयोग करता आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे तब्बल १४० जवान चोवीस तास आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना दिसून येत आहेत.महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मंगळवारी आणि बुधवारी १४७ कॉल्स आले. त्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी अधिक होत्या. सुमारे ९३ ठिकाणी पाणी साचल्याचे कॉल्स आले तर २० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी आगी लागल्या तर २९ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन राबवावे लागले. या साऱ्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे १४० कर्मचारी कार्यरत होते. निळ्या रेषेतील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे मोठे आव्हानात्मक काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागले. दलाने एरंडवाडी येथील १२५ रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. तर रामकुंड याठिकाणी अडकलेल्या १२ प्रवाशांची बोटीच्या साहाय्याने सुटका केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्मला कॉन्व्हेंट परिसरातील रामजानकी परिसरातील ४ वृद्ध महिलांची तसेच तेथील जवळच एका बंगल्यातून वृद्ध दाम्पत्याची सुटका करण्यात आली. अग्निशमनच्या बचाव पथकाने चांदोरी-सायखेडा याठिकाणीही धाव घेत आठ जणांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध आहे परंतु त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने साधनसामग्रीचा फारसा प्रभावीपणे वापर करता येऊ शकला नाही.