शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

आधारवरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

पाच वर्षांनंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी आधार कार्डवरील आपल्या हातांच्या बोटांचे ठसे जुळूून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

संजय शहाणे ।लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : पाच वर्षांनंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी आधार कार्डवरील आपल्या हातांच्या बोटांचे ठसे जुळूून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सुमारे बारा वर्षांपूर्वी आधार कार्ड ही योजना शासनाने राबविली. त्यावेळी परिसरातील समाजमंदिरांमध्ये ही योजना राबविण्यात आली. लांबच लांब रांगा लावून नागरिकांनी आधार कार्ड काढले. आधार कार्ड हे शासनाच्या विविध योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये बँकेत खाते उघडणे, ओळखपत्र, पॅन कार्ड जोडून घेणे, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, वाहनपरवाने काढणे यांसह विविध दाखले काढण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी बहुतेक नागरिक जागृत झाले आहे.आधार कार्ड काढताना दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे छायाचित्र घेण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती तिच आहे की तोतया हे ओळखणे सुलभ होते. सदर व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे ठसे संगणकावर घेतल्यावर त्याचा आधार कार्ड असलेली संपूर्ण माहिती येते. परंतु सुमारे चार ते पाच वर्षांनी बहुतेकांच्या हाताच्या बोटांच्या रेषांमध्ये बदल होतो. त्यामुळे त्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे घेतल्यास ते जुळत नाही. आता सर्वच कंपन्यांनी आधार कार्डशी संबंधित व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे ठसे जुळले तर लगेच सीमकार्ड देतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.