शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

नाशिकमधील रामायणकालीन भुयारी मार्ग शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:23 IST

पंतप्रधान कार्यालयाचा पुढाकार : गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या पत्राची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल टाकले आहे. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संबंधित पत्र पंतप्रधान कार्यालयाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे पंचवटीतील सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यामधील भूमिगत मार्गाचे उत्खनन होऊन त्यातून रामायणकालीन पौराणिक इतिहासाला उजाळा मिळू शकणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक रामभूमी म्हणून परिचित आहे. श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याच्या अनेक पाऊलखुणा आजही येथे आहेत. भाविक सीतागुंफा आवर्जून पाहतात. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचेदेवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या कालावधीत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरमध्ये येथील भुयारी मार्गासंदर्भात उल्लेख आहे. नाशिक त्र्यंबक गॅझेटियर १९४२ मध्ये प्रसिद्ध झाले, त्यातही हा संदर्भ आहे.सीतागुंफा म्हणजे सीतामाई यांच्या वास्तव्याचे स्थान. गुंफेच्या पाठीमागील बाजूस शिवलिंग असून, तेथून ते सात मैल लांब मखमलाबादच्या पुढे रामशेज किल्ल्यापर्यंत हे भुयार होते. प्रभू रामचंद्र या भुयारी मार्गानेच रामशेज नावाने परिचित असलेल्या ठिकाणी शयनासाठी जात असत. प्रभू रामचंद्र अज्ञातवासात असताना दंडकारण्यात भ्रमंती करताना सीतामाईला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गुंफेत ठेवत, त्यालाच सीतागुंफा हे नाव पडल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.सध्या गुंफेतील शिवलिंगाजवळील मार्ग बंद आहे. तो शोधल्याने पौराणिक इतिहास खुला होऊ शकेल. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. ते त्यांनी पुरातत्त्व खात्याला पाठविले आहे. त्याची प्रतही मिळाल्याचे जानी यांनी सांगितले.-----------प्रभू रामचंद्रांनी या भुयारी मार्गाचा वापर केला, अशी नोंद आहे. रामायणकालीन अनेक घटना पुढे येण्यासाठी पुरातत्त्व खात्याने उत्खनन करणे आवश्यक आहे.- देवांग जानी, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती------------सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.- दिनेश वैद्य, अध्यक्ष, व्यास ओरिएंटल रिसर्च ---------------रामशेज किल्लादिंडोरीरोडवरील आशेवाडी शिवारातील रामशेज किल्ला हे शिवप्रेमींचे आदराचे स्थान आहे. संभाजी राजे यांनी अखेरपर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. ------------सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.- दिनेश वैद्य, अध्यक्ष, व्यास ओरिएंटल रिसर्च