शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

नंदिनीच्या निमित्ताने विनोदचा शोध व्हावा

By admin | Updated: December 8, 2015 00:23 IST

मातृत्वासाठी अपहरण की ‘स्पा’साठी वारस?पोलीस यंत्रणेसमोर आव्हान

नाशिक : मूलबाळ होत नाही या कारणावरून साडेचार वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या शिवदास सातपुते याच्यावर यापूर्वीही विनोद आव्हाड या तरुणाच्या अपहरण घटनेत संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल असून, दोन वर्षे उलटूनही विनोदचा शोध लागलेला नाही हे विशेष, त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात योगायोगानेच (?) दुसऱ्यांदा जेरबंद झालेल्या सातपुतेच्या चौकशीत बेपत्ता विनोदचा शोध घेण्याबरोबर बालिकेचे अपहरण नेमके मातृत्वासाठी होते की गुन्हेगारी पोसणाऱ्या ‘स्पा’च्या वारसासाठी याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. नंदिनी राजेंद्र शर्मा या साडेचार वर्षीय बालिकेचे अपहरण प्रकरणाने चर्चेत आलेले शिवदास सातपुते व त्याची कथित पत्नी विद्या यांच्या पूर्वेतिहासावर उलट-सुलट चर्चा झडू लागली असून, पत्नी विद्या हिला मूलबाळ हवे असल्याने व ते होत नसल्यामुळेच नंदिनीचे अपहरण केल्याचे समर्थन जो शिवदास सातपुते करीत आहे, तत्पूर्वी त्याचा विवाह झालेला असून, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले असल्याने व तेही सिडकोत अश्विन सेक्टरला सुखरूप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच ‘स्पा’ (मसाज पार्लर)मध्ये जाण्याच्या त्याच्या सवयीतूनच सातपुतेची विद्याशी ओळख झाली व पुढे त्यांच्या संबंधात नाजुकता निर्माण झाल्याचे या व्यवसायाशी निगडित असलेल्यांचे म्हणणे आहे. अशाच महात्मानगर येथील एका ‘स्पा’च्या व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरून पंचवटीतील ओमकारनगरमध्ये राहणारा विनोद आव्हाड (२८) या तरुणाचे १७ डिसेंबर २०१३ रोजी रात्री अपहरण करण्यात आले. या प्रकरणी विनोद आव्हाड याच्या पत्नीने पंचवटी पोलिसांत अगोदर विनोदच्या बेपत्ता झाल्याची खबर दिली, त्यावरून पोलिसांनी तपास केला असता, बेपत्ता विनोदच्या भ्रमणध्वनीवरून वारंवार ज्या क्रमांकावर संभाषण करण्यात आले, त्यात शिवदास सातपुते, स्वाती बडगुजर, पराग सूर्यवंशी व अर्जुन ठाकूर या चौघांचा समावेश होता. त्यातही सातपुते याच्याशी विनोदचा आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यानेच घातपात करण्याच्या उद्देशाने विनोदचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने पोलिसांत दिल्यानंतर सातपुतेसह चौघांना अटक करण्यात आली. काही दिवसांनी ते जामिनावर मुक्त झाले; परंतु दोन वर्षे उलटूनही विनोदचा अद्याप शोध लागलेला नाही. या गुन्ह्यातून सातपुतेची निर्दोष सुटका झालेली नाही. मात्र ज्याचे अपहरण करण्यात आले तो विनोद आव्हाड याच्या पत्नीचेही शहरातील मध्यवस्तीत ‘स्पा’ होते व तेथेच विनोद व सातपुते या दोघांची गट्टी जमली होती हे विशेष. विनोदच्या अपहरण प्रकरणात न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या सातपुते व त्याच्या चिडलेल्या सहकाऱ्यांनी नंतर विनोदच्या पत्नीचे ‘स्पा’ बंद पाडण्यासाठी नको त्या खटाटोपी केल्या व विशेष म्हणजे त्यांच्या या कृत्यात पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याने अखेर सौ. आव्हाड यांना मध्यवस्तीतील ‘स्पा’ बंद करावे लागले, कालांतराने तेथून जवळच विद्या सातपुते ऊर्फ विद्या पताडे (पाटील) यांनी ‘स्पा’ सुरू केले व त्यानंतरच शिवदास सातपुते व विद्या पताडे यांचे सूत जमले. याचाच अर्थ ‘स्पा’ व्यवसायाच्या भोवतीच या साऱ्या घटना-घडामोडी वेगाने घडल्या असून, या व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. अशा व्यवसायाशी संंबंध ठेवणाऱ्यांकडून चार वर्षीय बालिकेचे अपहरण व्हावे व त्याचे मातृत्वाच्या गोंडस नावाने समर्थन करण्याची बाब खटकणारी आहे.