शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

नंदिनीच्या निमित्ताने विनोदचा शोध व्हावा

By admin | Updated: December 8, 2015 00:23 IST

मातृत्वासाठी अपहरण की ‘स्पा’साठी वारस?पोलीस यंत्रणेसमोर आव्हान

नाशिक : मूलबाळ होत नाही या कारणावरून साडेचार वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या शिवदास सातपुते याच्यावर यापूर्वीही विनोद आव्हाड या तरुणाच्या अपहरण घटनेत संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल असून, दोन वर्षे उलटूनही विनोदचा शोध लागलेला नाही हे विशेष, त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात योगायोगानेच (?) दुसऱ्यांदा जेरबंद झालेल्या सातपुतेच्या चौकशीत बेपत्ता विनोदचा शोध घेण्याबरोबर बालिकेचे अपहरण नेमके मातृत्वासाठी होते की गुन्हेगारी पोसणाऱ्या ‘स्पा’च्या वारसासाठी याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. नंदिनी राजेंद्र शर्मा या साडेचार वर्षीय बालिकेचे अपहरण प्रकरणाने चर्चेत आलेले शिवदास सातपुते व त्याची कथित पत्नी विद्या यांच्या पूर्वेतिहासावर उलट-सुलट चर्चा झडू लागली असून, पत्नी विद्या हिला मूलबाळ हवे असल्याने व ते होत नसल्यामुळेच नंदिनीचे अपहरण केल्याचे समर्थन जो शिवदास सातपुते करीत आहे, तत्पूर्वी त्याचा विवाह झालेला असून, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले असल्याने व तेही सिडकोत अश्विन सेक्टरला सुखरूप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच ‘स्पा’ (मसाज पार्लर)मध्ये जाण्याच्या त्याच्या सवयीतूनच सातपुतेची विद्याशी ओळख झाली व पुढे त्यांच्या संबंधात नाजुकता निर्माण झाल्याचे या व्यवसायाशी निगडित असलेल्यांचे म्हणणे आहे. अशाच महात्मानगर येथील एका ‘स्पा’च्या व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरून पंचवटीतील ओमकारनगरमध्ये राहणारा विनोद आव्हाड (२८) या तरुणाचे १७ डिसेंबर २०१३ रोजी रात्री अपहरण करण्यात आले. या प्रकरणी विनोद आव्हाड याच्या पत्नीने पंचवटी पोलिसांत अगोदर विनोदच्या बेपत्ता झाल्याची खबर दिली, त्यावरून पोलिसांनी तपास केला असता, बेपत्ता विनोदच्या भ्रमणध्वनीवरून वारंवार ज्या क्रमांकावर संभाषण करण्यात आले, त्यात शिवदास सातपुते, स्वाती बडगुजर, पराग सूर्यवंशी व अर्जुन ठाकूर या चौघांचा समावेश होता. त्यातही सातपुते याच्याशी विनोदचा आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यानेच घातपात करण्याच्या उद्देशाने विनोदचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने पोलिसांत दिल्यानंतर सातपुतेसह चौघांना अटक करण्यात आली. काही दिवसांनी ते जामिनावर मुक्त झाले; परंतु दोन वर्षे उलटूनही विनोदचा अद्याप शोध लागलेला नाही. या गुन्ह्यातून सातपुतेची निर्दोष सुटका झालेली नाही. मात्र ज्याचे अपहरण करण्यात आले तो विनोद आव्हाड याच्या पत्नीचेही शहरातील मध्यवस्तीत ‘स्पा’ होते व तेथेच विनोद व सातपुते या दोघांची गट्टी जमली होती हे विशेष. विनोदच्या अपहरण प्रकरणात न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या सातपुते व त्याच्या चिडलेल्या सहकाऱ्यांनी नंतर विनोदच्या पत्नीचे ‘स्पा’ बंद पाडण्यासाठी नको त्या खटाटोपी केल्या व विशेष म्हणजे त्यांच्या या कृत्यात पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याने अखेर सौ. आव्हाड यांना मध्यवस्तीतील ‘स्पा’ बंद करावे लागले, कालांतराने तेथून जवळच विद्या सातपुते ऊर्फ विद्या पताडे (पाटील) यांनी ‘स्पा’ सुरू केले व त्यानंतरच शिवदास सातपुते व विद्या पताडे यांचे सूत जमले. याचाच अर्थ ‘स्पा’ व्यवसायाच्या भोवतीच या साऱ्या घटना-घडामोडी वेगाने घडल्या असून, या व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. अशा व्यवसायाशी संंबंध ठेवणाऱ्यांकडून चार वर्षीय बालिकेचे अपहरण व्हावे व त्याचे मातृत्वाच्या गोंडस नावाने समर्थन करण्याची बाब खटकणारी आहे.