शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

सातबारा उतारा नाही तरीही आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: May 20, 2017 01:23 IST

नाशिक : शासनाच्या सेवा आॅनलाइन पुरविणाऱ्या ‘महाआॅनलाइन’चा तांत्रिक दोष दूर होण्याची चिन्हे नसून त्याचा आर्थिक फटका मात्र सेतू केंद्रचालकांना बसू लागला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या सेवा आॅनलाइन पुरविणाऱ्या ‘महाआॅनलाइन’चा तांत्रिक दोष दूर होण्याची चिन्हे नसून उलट दिवसागणिक त्यात वाढच होत असल्याने त्याचा आर्थिक फटका मात्र सेतू केंद्रचालकांना बसू लागला आहे. महाआॅनलाइनच्या माध्यमातून सातबारा उतारा देण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये नोंद होत असली तरी, सातबारा मात्र मिळत नसल्याने परिणामी एका सातबारा नोंदणीमागे ३३ रुपये भुर्दंड बसत असल्याची तक्रार केली जात आहे. राज्य शासनाच्या ‘महाआॅनलाइन’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सेतू केंद्रचालक वा महा-ई-सेवा केंद्रचालकांनी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखले तयार करून ते सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्याची प्रणाली सध्या कार्यरत असली तरी, गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून महाआॅनलाइनच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. राज्यपातळीवर हा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शासकीय दाखले तयार करणे व वितरणावर होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांना उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, जातीच्या दाखल्यांची गरज असून, त्यासाठी दररोज शेकडोच्या संख्येने अर्ज दाखल होत आहेत, परंतु सॉफ्टवेअरच्या तांत्रिक दोषामुळे तसेच सर्व्हर डाउन होत असल्याने दाखले तयार करण्यात अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे सेतू केंद्रचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेळेत दाखले तयार करणे शक्य होत नसून प्रलंबित दाखल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. दिवसा तांत्रिक दोष दाखविणारे सॉफ्टवेअर सायंकाळनंतर सुरळीत चालत असल्याने आता सेतू व महा-ई-सेवा केंंद्रचालकांना कामाच्या वेळा बदलाव्या लागल्या आहेत. शासकीय दाखल्यांसाठी ही परिस्थिती असताना संगणकीय सातबारा उतारा देण्यासाठीदेखील अशाच अडचणी येत आहेत. महा-ई-सेवा केंद्रचालक अथवा सेतू केंद्रचालकाकडून संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये नोंद केल्यास एरर दाखविला जातो, त्याचवेळी मात्र केंद्र चालकाच्या खात्यातून ३३ रुपये कपात केली जात आहे; मात्र सातबारा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात असून, या संदर्भात महाआॅनलाइनच्या समन्वयकाकडे तक्रारी करूनही उपयोग होत नाही. जिल्हा प्रशासनही या अडचणींकडे गांभीर्याने पाहत नसल्याने केंद्रचालक अडचणीत आहेत.