शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उतारा नाही तरीही आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: May 20, 2017 01:23 IST

नाशिक : शासनाच्या सेवा आॅनलाइन पुरविणाऱ्या ‘महाआॅनलाइन’चा तांत्रिक दोष दूर होण्याची चिन्हे नसून त्याचा आर्थिक फटका मात्र सेतू केंद्रचालकांना बसू लागला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या सेवा आॅनलाइन पुरविणाऱ्या ‘महाआॅनलाइन’चा तांत्रिक दोष दूर होण्याची चिन्हे नसून उलट दिवसागणिक त्यात वाढच होत असल्याने त्याचा आर्थिक फटका मात्र सेतू केंद्रचालकांना बसू लागला आहे. महाआॅनलाइनच्या माध्यमातून सातबारा उतारा देण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये नोंद होत असली तरी, सातबारा मात्र मिळत नसल्याने परिणामी एका सातबारा नोंदणीमागे ३३ रुपये भुर्दंड बसत असल्याची तक्रार केली जात आहे. राज्य शासनाच्या ‘महाआॅनलाइन’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सेतू केंद्रचालक वा महा-ई-सेवा केंद्रचालकांनी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखले तयार करून ते सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्याची प्रणाली सध्या कार्यरत असली तरी, गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून महाआॅनलाइनच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. राज्यपातळीवर हा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शासकीय दाखले तयार करणे व वितरणावर होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांना उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, जातीच्या दाखल्यांची गरज असून, त्यासाठी दररोज शेकडोच्या संख्येने अर्ज दाखल होत आहेत, परंतु सॉफ्टवेअरच्या तांत्रिक दोषामुळे तसेच सर्व्हर डाउन होत असल्याने दाखले तयार करण्यात अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे सेतू केंद्रचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेळेत दाखले तयार करणे शक्य होत नसून प्रलंबित दाखल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. दिवसा तांत्रिक दोष दाखविणारे सॉफ्टवेअर सायंकाळनंतर सुरळीत चालत असल्याने आता सेतू व महा-ई-सेवा केंंद्रचालकांना कामाच्या वेळा बदलाव्या लागल्या आहेत. शासकीय दाखल्यांसाठी ही परिस्थिती असताना संगणकीय सातबारा उतारा देण्यासाठीदेखील अशाच अडचणी येत आहेत. महा-ई-सेवा केंद्रचालक अथवा सेतू केंद्रचालकाकडून संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये नोंद केल्यास एरर दाखविला जातो, त्याचवेळी मात्र केंद्र चालकाच्या खात्यातून ३३ रुपये कपात केली जात आहे; मात्र सातबारा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात असून, या संदर्भात महाआॅनलाइनच्या समन्वयकाकडे तक्रारी करूनही उपयोग होत नाही. जिल्हा प्रशासनही या अडचणींकडे गांभीर्याने पाहत नसल्याने केंद्रचालक अडचणीत आहेत.