शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

अखेर लोहशिंगवे धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:45 IST

नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.

ठळक मुद्देलोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.

नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.पाण्याचा लाभ भालूर क्षेत्रातील शेतकरी वर्गास होणार आहे. लोहशिंगव्याच्या धरणावर मंगळवारी (दि.१६) रात्री १० वाजता लोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.रात्रीच्या वादावादी नंतर बुधवारी (दि.१७) भालूरकरांनी पाणी सोडले नाही तर आमरण उपोषण करू असे तहसीलदारांना पत्र दिले.शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी जल संधारण विभागाकडे २५,२०० रु. ची रक्कम अदा केली होती. पैसे भरून ही लोहशिंगवे येथील काही शेतकऱ्यांनी खोडसाळपणा करून गेट बंद पाडले व शासकीय कर्मचारी यास दमदाटी केल्याचे तीव्र पडसाद उमटले.गुरुवारी कळवणच्या उपअभियंता वैशाली ठाकरे, शाखा अभियंता सुनील गांगुर्डे, चौकीदार त्र्यंबक भोकनाळ व ताडगे यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.तत्पूर्वी नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्याकडे बैठक झाली. बैठकीस शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, लोहशिंगवेचे माजी सरपंच नथू हेंबाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परसराम शिंदे, पोपट सानप, पोपट गुळवे, भारत काकड, राजेंद्र तळेकर आदी उपस्थित होते.(१८ नांदगाव वॉटर)लोहशिंगवे धरणातून पाणी कालव्यात सुटले तो क्षण.

टॅग्स :water transportजलवाहतूकagricultureशेती