शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महामार्गावरील दत्तवाडी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:20 IST

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीजवळील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर गेल्या ४५ वर्षांपासून वसलेल्या दत्तवाडीतील घरे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज हटविली. चौफुलीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून बाजार समिती जोपूळ रोडला आल्याने चिंचखेड चौफुलीवर तासनतास वाहतूक कोंडी होत होती.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या भूखंडावरील घरे हटविली

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीजवळील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर गेल्या ४५ वर्षांपासून वसलेल्या दत्तवाडीतील घरे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज हटविली. चौफुलीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून बाजार समिती जोपूळ रोडला आल्याने चिंचखेड चौफुलीवर तासनतास वाहतूक कोंडी होत होती.दत्तवाडीतून जोपूळकडे जाणार रस्ता होता. मात्र स्थानिक राजकारण व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला होता. अखेर न्यायालयाची स्थगिती उठल्याने महसूल खाते व सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी राहणाऱ्या ३५ कुटुंबांना एक महिना आधीच नोटिसा बजावत जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेला रस्ता कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ताठर भूमिका घेत प्रशासनाला विरोध करत जागा खाली करण्यास नकार दिला. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने या बाबतीत रविवारी नागरिकांशी सवांद साधत जागा खाली करण्याची विनंती केली. तरीही नागरिकांनी नकार दिला. अखेर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कर्मचारी, ७५ पोलीस कर्मचारी, पाच अधिकाºयांचा ताफा, चार जेसीबी, दहा ट्रॅक्टर दत्तवाडीत दाखल झाले. तहसीलदारांच्या आदेशाने बाजार समितीचे ट्रॅक्टरही बोलावण्यात आले. पोलीस बंदोबस्तात दत्तवाडीच्या अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. काहीकाळ नागरिकांनी विरोध करत आठ दिवसाची मुदत द्या, अशी विनंती केली. मात्र एक महिना आधीच सूचना दिल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी आपल्या संसारोपयोगी वस्तू बाहेर काढल्यास सुरुवात केली. यात ग्रामपंचायत कर्मचाºयांनी नागरिकांना सहकार्य करत घरे खाली करून घेतली. यावेळी बांधकाम विभागाचे महेश पाटील, अतुल छापकर, नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, मंडल अधिकारी एस. ए. शेख, पोलीस निरीक्षक सुरेश मणोरे, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.सध्या बाजार समितीकडे जाणारी वाहने चिंचखेड चौफुलीवरून जोपूळ रस्त्यावर जातात. अतिक्र्रमण काढल्याने बाजार समितीला जोडणारा रस्ता थेट महामार्गाला जोडला जाणार आहे. महामार्ग ते बाजार समिती रस्ता या साडेपंधरा कोटींच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. महामार्गापासून कामाला सुरुवात होणार आहे. काही महिन्यातच चिंचखेड चौफुली मोकळा श्वास घेणार आहे. सकाळी ९:४५ सुरू मोहीम झाली दुपारी २ वाजेपर्यंत शंभर घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली.सर्व अधिकारी ठाण मांडून होते.सुरुवातीला थोडा विरोध झाला; मात्र नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.दत्तवाडीतील अतिक्र मण काढणे गरजेचे होते. अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यात ठरावीक कुटुंबानाच जागेची गरज आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेऊन निश्चितच मार्ग काढला जाईल.- अल्पेश पारख, ग्रामपंचायत सदस्य