शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

By admin | Updated: December 12, 2014 01:56 IST

निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

नाशिक : निर्मलग्राम योजनेत रायगड आणि सातारा हे जिल्हे पुढे असून, आपला जिल्हा पिछाडीवर असून गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकून जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले.येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व निर्मलग्राम पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदिंसह जिल्हा परिषद सदस्य व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चुंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मलग्राम अभियानात रायगड व सातारा जिल्हा अग्रेसर असून, नाशिक जिल्हा पिछाडीवर पडला आहे. संपूर्ण जिल्हाच निर्मलग्राम झाला पाहिजे, त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामेसवकांवर जबाबदारी टाकून त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगावे. शौचालय उभारणीसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, त्याचाही या निर्मलग्राम अभियानाला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविल्यास त्यांना शौचालय उभारणीसाठी जादा तरतूद करता येईल. निर्मलग्राम अभियान राबविताना ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी असून, ग्रामसेवकाने जनता आणि शासन यांच्यामध्ये दुव्याचे काम करावे. सभापती उषा बच्छाव व शोभा डोखळे यांनीही ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना, ग्रामसेवकांनी माझे गाव ही आत्मयिता ठेवून काम केल्यास गावाचा विकास होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरीकरणाचा वेग वाढला असून, ग्रामसेवकांच्या कामात बदल होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे मंदिर असून, ग्रामसेवकांनी हे ग्राममंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी झटत राहिले पाहिजे. यावेळी जि. प. सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती सभापती धर्मराज पवार, मंदाकिनी निकम, गोपाळ लहांगे, उपसभापती शांताराम मुळाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..यांना मिळाला आदर्श ग्रामसेवक पुरस्कारभरत पगार (बागलाण),मल्लिकार्जुन डांगरे (चांदवड), सिद्धार्थ आगळे (दिंडोरी),वैशाली पवार(देवळा), हरिभाऊ सूर्यवंशी (इगतपुरी), विजय देवरे (कळवण), विलास पाटील (मालेगाव), प्रमोद खैरनार (निफाड), बबन गोरे (नाशिक), हनुमंत दराडे (नांदगाव), मोतीराम चौधरी (पेठ), श्रीमती मंजुळा वाघेरे (सुरगाणा),जयवंत साखरे(सिन्नर),श्रीमती रूपाली पाटील(त्र्यंबकेश्वर),प्रमोद बोडके(येवला).