शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

By admin | Updated: December 12, 2014 01:56 IST

निर्मलग्राम योजनेतील पिछाडी भरून काढा : विजयश्री चुंबळे फटकारले :आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

नाशिक : निर्मलग्राम योजनेत रायगड आणि सातारा हे जिल्हे पुढे असून, आपला जिल्हा पिछाडीवर असून गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकून जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले.येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व निर्मलग्राम पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदिंसह जिल्हा परिषद सदस्य व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चुंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मलग्राम अभियानात रायगड व सातारा जिल्हा अग्रेसर असून, नाशिक जिल्हा पिछाडीवर पडला आहे. संपूर्ण जिल्हाच निर्मलग्राम झाला पाहिजे, त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामेसवकांवर जबाबदारी टाकून त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगावे. शौचालय उभारणीसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, त्याचाही या निर्मलग्राम अभियानाला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविल्यास त्यांना शौचालय उभारणीसाठी जादा तरतूद करता येईल. निर्मलग्राम अभियान राबविताना ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी असून, ग्रामसेवकाने जनता आणि शासन यांच्यामध्ये दुव्याचे काम करावे. सभापती उषा बच्छाव व शोभा डोखळे यांनीही ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना, ग्रामसेवकांनी माझे गाव ही आत्मयिता ठेवून काम केल्यास गावाचा विकास होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरीकरणाचा वेग वाढला असून, ग्रामसेवकांच्या कामात बदल होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे मंदिर असून, ग्रामसेवकांनी हे ग्राममंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी झटत राहिले पाहिजे. यावेळी जि. प. सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती सभापती धर्मराज पवार, मंदाकिनी निकम, गोपाळ लहांगे, उपसभापती शांताराम मुळाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..यांना मिळाला आदर्श ग्रामसेवक पुरस्कारभरत पगार (बागलाण),मल्लिकार्जुन डांगरे (चांदवड), सिद्धार्थ आगळे (दिंडोरी),वैशाली पवार(देवळा), हरिभाऊ सूर्यवंशी (इगतपुरी), विजय देवरे (कळवण), विलास पाटील (मालेगाव), प्रमोद खैरनार (निफाड), बबन गोरे (नाशिक), हनुमंत दराडे (नांदगाव), मोतीराम चौधरी (पेठ), श्रीमती मंजुळा वाघेरे (सुरगाणा),जयवंत साखरे(सिन्नर),श्रीमती रूपाली पाटील(त्र्यंबकेश्वर),प्रमोद बोडके(येवला).