शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वर्चस्वासाठी लढत

By admin | Updated: February 1, 2017 22:17 IST

आसखेडा गण : भाजपा, राष्ट्रवादीतच रंगणार लढत; इच्छुकांच्या आशा पल्लवित

नितीन बोरसे सटाणासर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बागलाण तालुक्यातील जायखेडा गटात दिग्गजांच्या होम ग्राउण्डवर वर्चस्वासाठी लढाई रंगणार आहे.जायखेडा गट म्हणजे माजी आमदार दिलीप व उमाजी बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार यांचे होम ग्राउण्ड असल्यामुळे बागलाणचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून मानला जातो. या दिग्गजांचा प्रभाव असल्यामुळे या गटात समाविष्ट असलेल्या आसखेडा गणाने तब्बल पाच वेळा सभापतिपदाचा बहुमान मिळून दिला आहे. हा गण यंदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूकदेखील चुरशी होणार असली तरी भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.आसखेडा गणाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपाच्या गीता विशाल सोनवणे या करत आहेत. यापूर्वी सामान्य कुटुंबातील पिंगळवाडे येथील युवा शेतकरी रवींद्र भामरे यांनी नेतृत्व केले आहे. गीता सोनवणे निवडून आल्यानंतर पहिले दोन वर्ष बागलाण पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला होता. या गणावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा प्रभाव राहिला असला तरी सन १९९१ व १९९६-९७ मध्ये शिखर बँकेचे माजी अध्यक्ष कै. जयवंतराव सावंत, सोमनाथ ब्राह्मणकर, माजी आमदार दिलीप बोरसे यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. शशिकांत देवरे, मंजुळाबाई कापडणीस, चिला निकम, प्रा.रामदास खैरनार यांनी अपक्ष बाजी मारली होती. या गणाचा या पाच वर्षाच्या काळात मात्र जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांनी पंचायत समिती सदस्या गीता सोनवणे यांना सोबत घेऊन पाणीप्रश्न, दळणवळण, सिंचन, आरोग्य, वीज आदि मूलभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच गाव तेथे बहुउद्देशीय केंद्र उभारून गणाचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या निवडणुकीत आसखेडा गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. आता हा गण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा दारूण पराभव केल्यामुळे या निवडणुकीत पराभवाचा बदला काढण्यासाठी राष्ट्रवादी जोर बैठका काढत आहे. या निवडणुकीत इच्छुकांची गर्दी असली तरी भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे तिकिटासाठी इच्छुकांची रांग मात्र मोठी आहे. उभय पक्षाकडे उमेदवारीसाठी चुरस आहे. एकंदरीत दिग्गज नेत्यांच्या होम ग्राउण्डवर रंगणाऱ्या या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारते, याकडे संपूर्ण बागलाणचे लक्ष लागून आहे.