शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

By admin | Updated: October 19, 2015 22:11 IST

भाजपाचा दावा : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त जाणार घराघरात

नाशिक : गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात जे त्यांना जमले नाही, ते आम्ही वर्षभराच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात करून दाखविल्याचा दावा भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केला.नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार अभियान, सौर ऊर्जा पंपवाटप अभियान यांसह काही महत्त्वपूर्ण घडामोडी या वर्षभरात झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात २३ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील ९० हजार बूथवर भाजपाच्या वतीने महालोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा झाला, तर आमच्या वर्षभराच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभर लोकसहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात आला असून, त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यात निव्वळ लोकसहभागाची रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथे स्मारक, तसेच लंडन येथील घर ३५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक होणार आहे. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपा सरकारने केवळ उद्योग, शेतकरी, सिंचनच नव्हे तर समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविकात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गिरीश पालवे, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, संभाजी मोरुसकर, सतीश कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)