शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

By admin | Updated: October 19, 2015 22:11 IST

भाजपाचा दावा : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त जाणार घराघरात

नाशिक : गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात जे त्यांना जमले नाही, ते आम्ही वर्षभराच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात करून दाखविल्याचा दावा भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केला.नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार अभियान, सौर ऊर्जा पंपवाटप अभियान यांसह काही महत्त्वपूर्ण घडामोडी या वर्षभरात झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात २३ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील ९० हजार बूथवर भाजपाच्या वतीने महालोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा झाला, तर आमच्या वर्षभराच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभर लोकसहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात आला असून, त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यात निव्वळ लोकसहभागाची रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथे स्मारक, तसेच लंडन येथील घर ३५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक होणार आहे. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपा सरकारने केवळ उद्योग, शेतकरी, सिंचनच नव्हे तर समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविकात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गिरीश पालवे, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, संभाजी मोरुसकर, सतीश कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)