शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

By admin | Updated: October 19, 2015 22:11 IST

भाजपाचा दावा : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त जाणार घराघरात

नाशिक : गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात जे त्यांना जमले नाही, ते आम्ही वर्षभराच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात करून दाखविल्याचा दावा भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केला.नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार अभियान, सौर ऊर्जा पंपवाटप अभियान यांसह काही महत्त्वपूर्ण घडामोडी या वर्षभरात झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात २३ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील ९० हजार बूथवर भाजपाच्या वतीने महालोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा झाला, तर आमच्या वर्षभराच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभर लोकसहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात आला असून, त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यात निव्वळ लोकसहभागाची रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथे स्मारक, तसेच लंडन येथील घर ३५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक होणार आहे. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपा सरकारने केवळ उद्योग, शेतकरी, सिंचनच नव्हे तर समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविकात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गिरीश पालवे, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, संभाजी मोरुसकर, सतीश कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)