शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार दिवसांपासून पंधरा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ...

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

चार दिवसांपूर्वी गोदाकाठ भागात जोरदार वादळ आले होते, पावसाने हजेरी लावली होती. या वादळात करंजगाव भागात विजेचे खांब पडले, तेव्हापासून म्हाळसाकोरे, औरंगपूर सबस्टेशन अंतर्गत येणारे भेंडाळी, म्हाळसाकोरे, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, शिंगवे, गोदानगर, शिंगवे, सोनगाव, बागलवाडी, औरंगपूर, तळवाडे, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भुसे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चार दिवसांपासून सर्व गावे अंधारात आहेत. या भागातील बहुतांशी नागरिक वस्तीवर राहतात. शेतातील विहिरीतून पंपाच्या साहाय्याने पाणी काढून पिण्यासाठी वापरतात जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याशिवाय माणसे आणि जनावरे मेटाकुटीला आली आहेत.

वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असले तरी सलग चार दिवस वीज पुरवठा सुरु होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या ठिकाणी नवीन काम उभे करायचे असल्यास ठेकेदार एका दिवसात शेकडो फूट अंतररावर वीज उभी करतात, मोठाले खांब उभे करतात. त्यात नफा असतो पण इथे कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होणार नसल्याने ठेकेदार मनात येईल तेव्हा आणि हळुवार काम करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.

---------------------

यंदाचा पहिलाच पाऊस आला आणि वीजेचे खांब पडले, वादळ येण्यापूर्वी आणि पावसाळा सुरु होण्याअगोदर संभाव्य कामे केली असती तर आज सलग चार दिवस वीज पुरवठा खंडित राहाण्याची वेळ आली नसती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

- रवींद्र देविदास खालकर, भेंडाळी

-------------------

करंजगाव येथे वाकलेला पोल. (०२ सायखेडा)

===Photopath===

020621\02nsk_12_02062021_13.jpg

===Caption===

०२ सायखेडा