शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

चार दिवसांपासून पंधरा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ...

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

चार दिवसांपूर्वी गोदाकाठ भागात जोरदार वादळ आले होते, पावसाने हजेरी लावली होती. या वादळात करंजगाव भागात विजेचे खांब पडले, तेव्हापासून म्हाळसाकोरे, औरंगपूर सबस्टेशन अंतर्गत येणारे भेंडाळी, म्हाळसाकोरे, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, शिंगवे, गोदानगर, शिंगवे, सोनगाव, बागलवाडी, औरंगपूर, तळवाडे, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भुसे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चार दिवसांपासून सर्व गावे अंधारात आहेत. या भागातील बहुतांशी नागरिक वस्तीवर राहतात. शेतातील विहिरीतून पंपाच्या साहाय्याने पाणी काढून पिण्यासाठी वापरतात जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याशिवाय माणसे आणि जनावरे मेटाकुटीला आली आहेत.

वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असले तरी सलग चार दिवस वीज पुरवठा सुरु होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या ठिकाणी नवीन काम उभे करायचे असल्यास ठेकेदार एका दिवसात शेकडो फूट अंतररावर वीज उभी करतात, मोठाले खांब उभे करतात. त्यात नफा असतो पण इथे कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होणार नसल्याने ठेकेदार मनात येईल तेव्हा आणि हळुवार काम करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.

---------------------

यंदाचा पहिलाच पाऊस आला आणि वीजेचे खांब पडले, वादळ येण्यापूर्वी आणि पावसाळा सुरु होण्याअगोदर संभाव्य कामे केली असती तर आज सलग चार दिवस वीज पुरवठा खंडित राहाण्याची वेळ आली नसती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

- रवींद्र देविदास खालकर, भेंडाळी

-------------------

करंजगाव येथे वाकलेला पोल. (०२ सायखेडा)

===Photopath===

020621\02nsk_12_02062021_13.jpg

===Caption===

०२ सायखेडा