शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

नाशिकसाठी रोज पंधरा ते वीस हजार वाढीव डोस हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्यांबरोबरच लसीकरणाचादेखील डाेस वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहराला ...

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्यांबरोबरच लसीकरणाचादेखील डाेस वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहराला लागणाऱ्या डोसपेक्षा किमान पंधरा ते वीस हजार वाढीव डोस द्यावेत, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य संचालक श्रीमती अर्चना पाटील यांनाही त्यांनी पत्र पाठवले आहे.

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दररोज रुग्णसंख्येत होणारी वाढ बघता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या पंधरा हजार ओलांडून पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे शहरात बाधितांना बेड‌्स आणि अन्य साहित्य मिळणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक रुग्णसंख्या वाढू न देता कोरोनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याची गरज आहे. शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असले तरी लसींचे डोस संपल्याने नागरिकांना माघारी जावे लागत आहे. महापालिकेने मागणी नोंदवूनदेखील पुरेशा प्रमाणात डाेस उपलब्ध होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे लसींचा मागणीनुसार पुरवठा करताना शहरात लागणाऱ्या लसींच्या डोसच्या तुलनेत पंधरा ते वीस हजार वाढीव डाेसचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या नाशिक शहरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार शहराकरिता वाढीव लसीकरण डोस आवश्यक असल्यास वेळेप्रसंगी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच किरीट सोमय्या आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही महापौर कुलकर्णी यांनी पत्र देऊन नाशिककरिता वाढीव डोस मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. इन्फो... कोरोनाचा वाढता संसर्ग बघता आता कोणत्याही एका उपचार पद्धतीवर अवलंबून न राहता कोरोनीलसारखी आयुर्वेदिक औषधे किंवा आर्सेनिक अल्बमसारखी होमिओपॅथिक प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. यातील काही औषधांची टंचाईदेखील जाणवत आहे, इतकी पारंपरिक औषधे प्रभावी ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा पारंपरिक औषधांचादेखील उपयोग करावा, असे आवाहन महापौरांनी आयुक्तांना एका पत्राव्दारे केले आहे.