शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

दर पंधरा दिवसांनी तुंबतात गटारी !

By admin | Updated: June 26, 2016 21:53 IST

सिंहस्थनगर : पालिकेचे दुर्लक्ष; अनारोग्याच्या वातावरणाने पसरते रोगराई

 सिंहस्थनगर, सिडको : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४४ मधील सिंहस्थनगरात अनेक समस्या असून, गटारींची प्रमुख अडचण आहे. पालिकेच्या भुयारी गटार योजना कुचकामी ठरली आहे. दर पंधरा दिवसांनी या भागातील गटारी तुंबतात आणि रस्त्यावरच वाहतात. पालिकेकडे तक्रारी केल्यानंतर कधी तरी कर्मचारी येतात. मात्र, संपूर्ण समस्या कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांनी ‘लोकमत’ टीमपुढे केला. ‘लोकमत तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत सिंहस्थनगरातील नागरिकांनी परिसरातील समस्यांची जंत्रीच मांडली. तथापि, गटारीच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेच्या गटार योजनेचा नागरिकांना त्रास होतो. गटारींची लेव्हल योग्य नाही तसेच मलवाहिका छोट्या असल्याने या भागात सातत्याने गटारी तुंबतात. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पालिकेच्या वतीने कंत्राटी कर्मचारी पाठविले जातात. हे कर्मचारी तुंबलेल्या चेंबरचे झाकण काढून स्वच्छता करतात. पंरतु सर्व कचरा आणि घाण याच ठिकाणी टाकून मोकळे होतात. स्वामी समर्थ केंद्राच्या समोरच चेंबर असून, तेथेच गटार तुंबते. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष परिसरात कचरा आणि पावसाळी पाणी साचण्याची समस्या आहे. महापालिकेकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.