शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खतप्रकल्पाची दुर्गंधी वाढलीं

By admin | Updated: July 19, 2016 01:39 IST

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रकल्पाची लागली वाट, उपाययोजनेकडे डोळेझाक

 सिडको : पांडवलेणीनजीक असलेल्या महापालिकेच्या खतप्रकल्पाची दुर्गंधी परिसरात पसरत असून, पावसामुळे यात अधिक भर पडत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खतप्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू नसून प्रकल्पाची पूर्णपणे वाट लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.महापालिकेच्या वतीने याठिकाणी खातप्रकल्प सुरू करताना याचा कोणालाही त्रास होणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतु खतप्रकल्प सुरू झाल्यानंतर मात्र मनपाला याचा विसर पडला. या खतप्रकल्पाची दुर्गंधी परिसरातील गावांबरोबरच पाथर्डी फाटा, अश्विननगर या भागापर्यंत पोहचली असल्याने नागरिकांनी मनपाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच खतप्रकल्पाच्या ढिगाऱ्याखाली कचरा गोळा करीत असताना दुपारच्या सुमारास एका महिलेसह चिमुकली गाडली गेली होती. याच खतप्रकल्पामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात राहणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या महिलांसह काही नागरिक आतमध्ये कायमच शिरकाव करतात. परंतु यानंतरही मनपा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत मनपास कळत नसल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या खतप्रकल्पात पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू नसल्याचे अनेकदा उघडकीस झाले आहे. तसेच याआधीही याठिकाणी आग लावण्यात आली होती. परंतु दुर्घटना घडल्यानंतरही मनपाकडून याकडे गांर्भीयाने बघितले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याठिकाणी असलेल्या लाखो रुपयांच्या मशिनरी धूळखात पडून असून, खतप्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे समजते. येथे असलेली सुरक्षाव्यवस्था कमकुवत असून मनपाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)