शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या संकटाची भीती

By admin | Updated: July 22, 2016 22:27 IST

चिंता : पावसाची वक्र दृष्टी

येवला : तालुक्यातील खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी मुळात बहुतांशी भागात पर्जन्यमान कमीच आहे. अल्पपावसाच्या ओलीत पेरण्या आटोपल्या असल्या तरीही पावसाने विश्रांती घेतल्याने यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, दुबार पेरणीचे संकटही उभे राहू नये म्हणून बळीराजाने पुन्हा महादेवाला साकडे घातले आहे.सूर्यदर्शन होत नसून सर्वत्र केवळ ढगाळ वातावरण आहे; परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय उतरून पडलेले मका, बाजरी, मूग, पीक आता पिवळे पडत आहे. शिवाय मका या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्याची चिंता अधिकच वाढली आहे. पीकविमा घेण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा ऐन हंगामात पुन्हा वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने चिंता वाढली आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी चांगल्या पर्जनवृष्टीची अपेक्षा बाळगून होते. मात्र मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले आणि आर्द्रा नक्षत्रातील जेमतेम पावसावर काही भागात ५० टक्के खरीप पेरण्यांची कामे आटोपली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पुनर्वसू नक्षत्रानेही शेतकऱ्यांची निराशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस भीज पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी कपाशी, मका, बाजरी, भुईमूग व कडधान्य पिकांच्या पेरण्यांना गती दिली. त्यामुळे १०० टक्के क्षेत्रावर पेरण्यांची कामे आटोपली. मात्र, आठवड्यापासून फक्त ढगाळ वातावरण असून, पाऊस बेपत्ता झाला आहे. आता पाण्याअभावी पिके संकटात सापडली आहेत. तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला; पण सध्या पावसाने पाठ फिरवली आहे तर पश्चिम भागात अद्यापही दमदार पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने विहिरींना पाणी उतरणे तर दूरच जमिनीची तहानदेखील भागलेली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठ्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजावर पुन्हा कर्ज काढून उभारी धरलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारा छावण्या तर येवला तालुक्याला मृगजळच ठरल्या.भीज पावसाने निर्माण झालेल्या हिरवळीवर सध्या जनावरे पोसली जात आहेत. (वार्ताहर)