शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दुबार पेरणीच्या संकटाची भीती

By admin | Updated: July 22, 2016 22:27 IST

चिंता : पावसाची वक्र दृष्टी

येवला : तालुक्यातील खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी मुळात बहुतांशी भागात पर्जन्यमान कमीच आहे. अल्पपावसाच्या ओलीत पेरण्या आटोपल्या असल्या तरीही पावसाने विश्रांती घेतल्याने यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, दुबार पेरणीचे संकटही उभे राहू नये म्हणून बळीराजाने पुन्हा महादेवाला साकडे घातले आहे.सूर्यदर्शन होत नसून सर्वत्र केवळ ढगाळ वातावरण आहे; परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय उतरून पडलेले मका, बाजरी, मूग, पीक आता पिवळे पडत आहे. शिवाय मका या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्याची चिंता अधिकच वाढली आहे. पीकविमा घेण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा ऐन हंगामात पुन्हा वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने चिंता वाढली आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी चांगल्या पर्जनवृष्टीची अपेक्षा बाळगून होते. मात्र मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले आणि आर्द्रा नक्षत्रातील जेमतेम पावसावर काही भागात ५० टक्के खरीप पेरण्यांची कामे आटोपली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पुनर्वसू नक्षत्रानेही शेतकऱ्यांची निराशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस भीज पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी कपाशी, मका, बाजरी, भुईमूग व कडधान्य पिकांच्या पेरण्यांना गती दिली. त्यामुळे १०० टक्के क्षेत्रावर पेरण्यांची कामे आटोपली. मात्र, आठवड्यापासून फक्त ढगाळ वातावरण असून, पाऊस बेपत्ता झाला आहे. आता पाण्याअभावी पिके संकटात सापडली आहेत. तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला; पण सध्या पावसाने पाठ फिरवली आहे तर पश्चिम भागात अद्यापही दमदार पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने विहिरींना पाणी उतरणे तर दूरच जमिनीची तहानदेखील भागलेली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठ्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजावर पुन्हा कर्ज काढून उभारी धरलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारा छावण्या तर येवला तालुक्याला मृगजळच ठरल्या.भीज पावसाने निर्माण झालेल्या हिरवळीवर सध्या जनावरे पोसली जात आहेत. (वार्ताहर)