शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

देवळा तालुक्यात गर्दीमुळे बाधित वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

देवळा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ एप्रिलपासून दहा दिवस देवळा ...

देवळा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ एप्रिलपासून दहा दिवस देवळा तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्यामुळे दुकाने बंद होती. त्यानंतर शासनाच्या लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे महिनाभरापासून देवळा शहरातील दुकाने बंद होती. त्याचे सकारात्मक परिणाम होऊन नियमित सापडणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या सुरुवातीला स्थिर झाली व नंतर ती हळूहळू कमी होऊ लागली. जनतेची गैरसोय होऊ नये व अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली. परंतु ह्या निर्धारित वेळेत दुकाने सुरू असतांना कोरोना नियमांचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. सामान व भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. काही अपवाद सोडले तर दुकानदार देखील ग्राहकांनी कोरोना नियमांचे पालन करावे याकडे दुर्लक्ष करत असून व्यवसाय वाढीकडे लक्ष ठेवताना दिसत आहेत. देवळा शहरात सुरुवातीला नियमितपणे तीस ते बत्तीस कोरोना रूग्ण सापडत असताना सध्या ती संख्या दहाच्या आत आलेली आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांनाच श्रेय द्यावे लागेल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दिवसभर ह्या यंत्रणा सज्ज असतात. पाच कंदील परिसरात पायी फिरणारे नागरिक व वाहन चालकांना पोलीस घराबाहेर पडण्याचे कारण विचारताना दिसतात. सबळ कारण नसेल तर दंडात्मक कारवाई करतात. यामुळे इतर वेळी नियमांचे काटेकोरपणे पालन होत असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत मात्र पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे अस्तित्व जाणवत नाही. सर्रास नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनाकडे त्यांचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी व कोरोनापासून शहराला दूर ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.