शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

देवळा तालुक्यात गर्दीमुळे बाधित वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

देवळा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ एप्रिलपासून दहा दिवस देवळा ...

देवळा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ एप्रिलपासून दहा दिवस देवळा तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्यामुळे दुकाने बंद होती. त्यानंतर शासनाच्या लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे महिनाभरापासून देवळा शहरातील दुकाने बंद होती. त्याचे सकारात्मक परिणाम होऊन नियमित सापडणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या सुरुवातीला स्थिर झाली व नंतर ती हळूहळू कमी होऊ लागली. जनतेची गैरसोय होऊ नये व अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली. परंतु ह्या निर्धारित वेळेत दुकाने सुरू असतांना कोरोना नियमांचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. सामान व भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. काही अपवाद सोडले तर दुकानदार देखील ग्राहकांनी कोरोना नियमांचे पालन करावे याकडे दुर्लक्ष करत असून व्यवसाय वाढीकडे लक्ष ठेवताना दिसत आहेत. देवळा शहरात सुरुवातीला नियमितपणे तीस ते बत्तीस कोरोना रूग्ण सापडत असताना सध्या ती संख्या दहाच्या आत आलेली आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांनाच श्रेय द्यावे लागेल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दिवसभर ह्या यंत्रणा सज्ज असतात. पाच कंदील परिसरात पायी फिरणारे नागरिक व वाहन चालकांना पोलीस घराबाहेर पडण्याचे कारण विचारताना दिसतात. सबळ कारण नसेल तर दंडात्मक कारवाई करतात. यामुळे इतर वेळी नियमांचे काटेकोरपणे पालन होत असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत मात्र पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे अस्तित्व जाणवत नाही. सर्रास नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनाकडे त्यांचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी व कोरोनापासून शहराला दूर ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.