शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

गाजराच्या शेतीतही नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:20 AM

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देवणी : भाव नसल्याने प्र्रयोगशील शेतकऱ्याचे मनोबल खचले . भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला.

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, टमाटा, ऊस अशी नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. याबरोबरच सोयाबीन, मका, गहू, भात अशी तत्सम पिकेही तुलनात्मकरीत्या घेण्यात येतात. भाजीपाला, स्ट्रॉबेरी असेही पर्याय आहेत. नवीन प्रयोग उत्पादनाच्या माध्यमातून घेण्याचा असाच निर्णय दिंडोरी तालुक्यातील राजेंद्र निखाडे या युवा शेतकºयाने घेतला. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात गाजराची लागवड केली. डिसेंबर महिन्यात लागवड केली. लागवडीपासून उत्पादनापर्यंत २० हजार रुपये खर्च आला. एकरी १५० क्विंटल अपेक्षित उत्पादनाचे प्रमाण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्पादन सुरू झाले. प्रथमत: नाशिकच्या बाजार समितीत विक्रीसाठी गाजरे पाठविली. मात्र अवघ्या दोन रु पये किलो भावाने विक्री करावी लागली. भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला. अर्धा ते एक फूट लांबीची गाजरे, किमान १५० ते १७६ ग्रॅम एका गाजराचे वजन, गाजराची खुडणी करून ती स्वच्छ पाण्याने धुवून गोण्यांमधे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवायची अशी प्रणाली; मात्र नुकसानीला सामोरे जावे लागल्याने गुजरात राज्यातील बडोदा येथे सध्या गाजरे विक्र ीसाठी पाठविण्याचा निर्णय निखाडे यांनी घेतला. सहा ते सात रुपयांचा भाव मिळतो आहे. मात्र बारा ते पंधरा रुपये किलो भावाने विक्र ी झाली तरच गाजराची शेती फायद्याची, नाही तर नुकसानीची भीती अशी वास्तविकता असल्याची माहिती निखाडे यांनी दिली. शेतकºयांचे मनोबल खचलेनिफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा भागात गाजराचे उत्पादन घेण्यात येते. त्या ठिकाणाहून गाजरे आणून लागवड करणाºया निखाडेंना गाजराच्या शेतीने आर्थिक सुदृढता दिली नाही. त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करून वेगळे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाºया शेतकºयांचे मनोबल खचले आहे.