शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू :  नरेंन गोईदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:32 IST

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो.

नाशिक : भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो. त्यातून विविध प्रकारची संकटे निर्माण होत असल्याचे प्रतिपादन लाइफ स्कूलचे संस्थापक नरेंन गोईदानी यांनी केले.के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१९) कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प गुंफताना नरेंन गोईदानी यांनी ‘चलो कुछ कमाल करें’ या विषयावर व्याख्यान देताना मनुष्याच्या जीवनात भीतीमुळे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करताना त्यापासून दूर राहण्याचे विविध पर्यायही सुचविले. ते म्हणाले, की जीवनात अनेक आव्हाने येतील, अपयशाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रतिकाराची शक्ती आपल्यात असेल तर आपल्यावर भीती हावी होणार नाही. चांदोरी येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. टी. कडवे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जैन, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्रा. डॉ. एस. एस. साने आदी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयcultureसांस्कृतिक