शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडला पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: March 1, 2017 00:06 IST

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्र मांक ३६ वरील पाणीवापर संस्था व शेतकरी यांना पाण्याच्या हक्काचा निर्धारित पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी या क्षेत्रातील १४ पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष आणि शेतकरी मंगळवारी येथील पालखेड उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.  चिचोंडी, बदापूर, पारेगाव, निमगावमढ, नाटेगाव,अंगणगाव, बाभूळगाव या ठिकाणच्या विविध १४ पाणीवापर संस्थांना १० जानेवारीच्या पहिल्या आवर्तनात ६० टक्के पाणी आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आवर्तनात ४० टक्के पाणी देण्याचे पाटबंधारे खात्याचे नियोजन होते. पाणी वापर संस्थांचे चेअरमन भाऊसाहेब कांबरे, श्याम मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, बबन मढवई, चंद्रकांत मोरे, यतिन पटेल, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, विठ्ठल आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्रीनाथ मढवई यांच्यासह शेतकऱ्यांनी पालखेड मुख्य अभियंता यांना सह्यांचे निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चारी नंबर ३६ या भागात चारी ओलीदेखील झाली नाही. अशातच पाणी बंद केले. पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे, अशी जोरदार मागणी उपोषणास बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर) पहिल्या आवर्तनात चिचोंडी परिसरातील या १४ पाणीवापर संस्थांना केवळ ४० ते ४५ टक्के पाणी कोटा मिळाला. आता दुसरे पाणी आवर्तन सुरू होऊन १० ते १२ दिवस झाले. टेलकडून वितरकांना पाणी देण्यात आले. ३६ चारीवरील शेतकऱ्यांना ४० टक्के पाणी कोटा देण्याचे नियोजन असताना अभियंता आणि कर्मचारी यांनी कोटा शिल्लक नसल्याचे कारण सांगत केवळ दोन दिवसात चारी केवळ ओली करीत पाणी बंद केले.   या परिसरातील २,९३६ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. पाणी आवर्तनाच्या आमच्या हक्काचे ४० टक्के पाणी द्यावे, अशी मागणी यापूर्वीच पालखेड अभियंता यांना या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. आणि त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. शिवसेना नेते संभाजी पवार, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, कालवा सल्लागार समिती सदस्य सुरेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली. पालखेड अधिकारी कोणीही उपोषणस्थळी फिरकले नाहीत. शासनाची अकार्यक्षमता अधिकाऱ्यांची उदासीनता, नियोजनाचा अभाव, पाणी वितरण व्यवस्थेत असलेला अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.