शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

पालखेडला पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: March 1, 2017 00:06 IST

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्र मांक ३६ वरील पाणीवापर संस्था व शेतकरी यांना पाण्याच्या हक्काचा निर्धारित पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी या क्षेत्रातील १४ पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष आणि शेतकरी मंगळवारी येथील पालखेड उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.  चिचोंडी, बदापूर, पारेगाव, निमगावमढ, नाटेगाव,अंगणगाव, बाभूळगाव या ठिकाणच्या विविध १४ पाणीवापर संस्थांना १० जानेवारीच्या पहिल्या आवर्तनात ६० टक्के पाणी आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आवर्तनात ४० टक्के पाणी देण्याचे पाटबंधारे खात्याचे नियोजन होते. पाणी वापर संस्थांचे चेअरमन भाऊसाहेब कांबरे, श्याम मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, बबन मढवई, चंद्रकांत मोरे, यतिन पटेल, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, विठ्ठल आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्रीनाथ मढवई यांच्यासह शेतकऱ्यांनी पालखेड मुख्य अभियंता यांना सह्यांचे निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चारी नंबर ३६ या भागात चारी ओलीदेखील झाली नाही. अशातच पाणी बंद केले. पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे, अशी जोरदार मागणी उपोषणास बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर) पहिल्या आवर्तनात चिचोंडी परिसरातील या १४ पाणीवापर संस्थांना केवळ ४० ते ४५ टक्के पाणी कोटा मिळाला. आता दुसरे पाणी आवर्तन सुरू होऊन १० ते १२ दिवस झाले. टेलकडून वितरकांना पाणी देण्यात आले. ३६ चारीवरील शेतकऱ्यांना ४० टक्के पाणी कोटा देण्याचे नियोजन असताना अभियंता आणि कर्मचारी यांनी कोटा शिल्लक नसल्याचे कारण सांगत केवळ दोन दिवसात चारी केवळ ओली करीत पाणी बंद केले.   या परिसरातील २,९३६ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. पाणी आवर्तनाच्या आमच्या हक्काचे ४० टक्के पाणी द्यावे, अशी मागणी यापूर्वीच पालखेड अभियंता यांना या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. आणि त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. शिवसेना नेते संभाजी पवार, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, कालवा सल्लागार समिती सदस्य सुरेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली. पालखेड अधिकारी कोणीही उपोषणस्थळी फिरकले नाहीत. शासनाची अकार्यक्षमता अधिकाऱ्यांची उदासीनता, नियोजनाचा अभाव, पाणी वितरण व्यवस्थेत असलेला अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.