शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

कंत्राटी कामगारांचे उपोषण : आरोग्य विद्यापीठ सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:03 IST

विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली.

नाशिक : विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे आणि कामावरून कमी केलेल्या ९ कामगारांसह सर्व कामगारांना एकाचवेळी कामावर घेण्याच्या मागण्यांविषयी विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारपर्यंत कामगारांचे उपोषण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांविषयी विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मकता दाखवली असली तरी याविषयावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांसदर्भात मंगळवारी (दि.८) दुपारी पुन्हा शिष्टमंडळ व विद्यापीठ प्रशासनासह आमदार सानप यांची बैठक होणार असून, या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सानप यांनी दिले. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलकांनी अंतिम निर्णय झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याची भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आमदार बाळासाहेब सानप व कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी कामगारांना दिले आहे. यावेळी कामगार उपायुक्त किशोर दहीफळकर, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी मुंबईत पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली.जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंगमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, सहा आंदोलकांची प्रकृतीही बिघडली आहे. यातील काहींची प्रकृती अतिशय गंभीर बनलेली असताना जिल्हाधिकाºयांशी चर्चेसाठी सतत सात दिवस पाठपुरावा केल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून केवळ पाच मिनिटांचाच वेळ मिळाला. आंदोलकांच्या शिष्टमंडळानेही पाच मिनिटांतच कामगारांची भूमिका मांडली. परंतु जिल्हाधिकाºयांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता शिष्टमंडळास आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आंदोलकांचा जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया सीटूचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ