शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कंत्राटी कामगारांचे उपोषण : आरोग्य विद्यापीठ सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:03 IST

विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली.

नाशिक : विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे आणि कामावरून कमी केलेल्या ९ कामगारांसह सर्व कामगारांना एकाचवेळी कामावर घेण्याच्या मागण्यांविषयी विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारपर्यंत कामगारांचे उपोषण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांविषयी विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मकता दाखवली असली तरी याविषयावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांसदर्भात मंगळवारी (दि.८) दुपारी पुन्हा शिष्टमंडळ व विद्यापीठ प्रशासनासह आमदार सानप यांची बैठक होणार असून, या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सानप यांनी दिले. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलकांनी अंतिम निर्णय झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याची भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आमदार बाळासाहेब सानप व कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी कामगारांना दिले आहे. यावेळी कामगार उपायुक्त किशोर दहीफळकर, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी मुंबईत पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली.जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंगमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, सहा आंदोलकांची प्रकृतीही बिघडली आहे. यातील काहींची प्रकृती अतिशय गंभीर बनलेली असताना जिल्हाधिकाºयांशी चर्चेसाठी सतत सात दिवस पाठपुरावा केल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून केवळ पाच मिनिटांचाच वेळ मिळाला. आंदोलकांच्या शिष्टमंडळानेही पाच मिनिटांतच कामगारांची भूमिका मांडली. परंतु जिल्हाधिकाºयांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता शिष्टमंडळास आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आंदोलकांचा जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया सीटूचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ