शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

कर्जमाफी विरोधात उपोषण

By admin | Updated: June 27, 2017 01:26 IST

सायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने ३० जून २०१५-१६ पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफी निकषात केवळ ८ ते १० टक्केच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर उर्वरित नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे. ही शेतकऱ्यांची चेष्टा असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात पेटून उठण्याची गरज व्यक्त करत सायगावकरांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत पुन्हा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवली आहे.  एका बाजूला सरसकट कर्जमाफीचा शब्दप्रयोग करायचा व दुसऱ्या बाजूने विविध निकषांचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळायचा या नीतीचा अवलंब सरकारने केला आहे असल्याची माहिती शिवाजी भालेराव यांनी दिली. उपोषणास येवला तालुका खरेदी-विक्री संघ संचालक भागुनाथ उशीर, सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख, दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, रघुनाथ खैरनार, महेंद्र उशीर, रामनाथ उशीर, एकनाथ भालेराव, विठ्ठल दारुंटे, संजय देशमुख, बशीरभाई शेख, वसंतराव खैरनार, पोपट भालेराव, शिवाजी उशीर, सीताराम लोहकरे, काशीनाथ जठार, पारसनाथ सोनवणे, जिजाराम उशीर, नाना  उशीर, देवराम उशीर, दत्तू उशीर, दत्तात्रय कुळधर, संजय मुळे यांच्यासह सव्वाशे शेतकरी उपस्थित होते.