शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:37 IST

येवला तालुक्यातील वातावरण सातत्याने बदलत असून, दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुके सकाळी ११ वाजेपर्यंत राहात असल्याने रब्बी हंगामातील पिके रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत आहेत, तर या हवामानाचा फटका आरोग्यावरदेखील होत असल्याचे दिसून आले असून, साथीच्या आजाराचे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत.

ठळक मुद्देहवामान बदल : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; फवारणीचा खर्च वाढला

मानोरी : येवला तालुक्यातील वातावरण सातत्याने बदलत असून, दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुके सकाळी ११ वाजेपर्यंत राहात असल्याने रब्बी हंगामातील पिके रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत आहेत, तर या हवामानाचा फटका आरोग्यावरदेखील होत असल्याचे दिसून आले असून, साथीच्या आजाराचे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत.धुक्याबरोबर थंडीचे प्रमाणदेखील वाढले आहे. वातावरणातील या बदलामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहेत. द्राक्ष आणि कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली असून, कधी कधी रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करावी लागत आहे, तर कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले आहे. तसेच नवीन लागण केलेल्या कांद्याचे डोंगळेही सडण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा कांद्याचे दर चांगल्या प्रकारे टिकून असल्याने येवला तालुक्यात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून कांदा लागवड मोठ्या जोमाने सुरू आहे. अवकाळी पावसाने रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकरी रोपांची शोधाशोध करत असून, रोपे विकत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कांद्याला सध्या बाजारभाव चांगल्या प्रकारे टिकून असल्याने यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले जात होते.या आशेने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोपे तयार करण्यासाठी धावपळ करत होते. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीच्या अपेक्षेवर पूर्ण पाणी फेरल्याने लागवडीसाठी आलेली कांद्याची रोपे अवकाळी पावसाने एका रात्रीतून भुईसपाट झाली तर अनेक रोपे पावसाच्या पाण्याने सडून गेल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांना रोपाअभावी कांदा लागवडीवर ब्रेक लागला आहे. तर काही शेतकरी मिळेल तेथून आणि मिळेल त्या भावाने रोप आणत असून, कांदा लागवडीवर भर देत आहेत.मात्र, सध्या सुरू असलेल्या हवामान बदलामुळे पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने उत्पादन निघेल की नाहीआणि केलेला खर्च निघेल की नाही याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. महागडी औषधे खरेदी करून शेतकरी कांदा पिकावर फवारणी करीत असताना दिसून येत आहेत. ढगाळ हवामानाचा द्राक्ष, कांदा पिकासह रब्बीच्या गहू , हरभरा आदी पिकांना मोठा फटका बसत आहे. धुक्यामुळे नवीन लागवड झालेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे पिके जगविताना शेतकºयांना महागडी कीटकनाशके, बुरशीनाशक व पोषक या औषधांसाठी सुमारे पाच हजार रुपयापर्यंत खर्च होत आहे.एक महिन्यापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने द्राक्षबाग, कांदा, कांदा रोप, गहू, हरभरा पिके धोक्यात आली असून, पिके वाचविण्यासाठी औषध फवारणी सुरू आहे. मात्र, उत्पादन निघाल्यानंतर दर मिळेल की नाही आणि केलेला खर्च सुटतो की नाही याची चिंता आहे.- स्वप्नील कोटमे, शेतकरीपंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, हे वातावरण माणसाच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे. त्यात अधूनमधून कडाक्याची थंडी पडत असल्याने वातावरणातील या बदलाने रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी थंडीच्या दिवसात उबदार कपडे आणि दररोज पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. तसेच गरजेच्या वेळीच घराबाहेर पडावे.- डॉ. सुनील उन्हाळे

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र