शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

--------------------- पांढरी वस्ती शाळेत वृक्षारोपण नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी वस्ती येथे "डोनेट ...

---------------------

पांढरी वस्ती शाळेत वृक्षारोपण

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी वस्ती येथे "डोनेट अ डिव्हाइस" उपक्रमांतर्गत गरीब विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइलवाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारात झाडे लावण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद, पण शिक्षण चालू" या उपक्रमानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

---------------------------

वाढत्या महागाईने नागरिक हैराण

नांदूरशिंगोटे : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने भाववाढ कमी करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

---------------------------

कांद्याला दोन हजार रुपये भाव

नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळाला. या लिलावासाठी एकूण ८१०६ गोण्या म्हणजे ४५४० क्विंटल आवक झाली होती. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कांद्याच्या भावात चढउतार दिसून येत आहे. सरासरी १७०० ते १८०० रुपये भाव मिळाला आहे.

---------------------------

कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सेवा संस्कार संस्थेच्या मालदाड (ता. संगमनेर) येथील कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाडचे विद्यार्थी कृषीदूत योगेश राजेंद्र बैरागी यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभवाच्या अभ्यासदौऱ्याचा आरंभ केला. कृषीदूत बैरागी यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीविषयी सुरक्षिततेचे उपाय, काळजी आणि कोविड लसीकरण जनजागृती केली.

----------------------------

दापूर परिसरात आंतरमशागत कामांना वेग

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिके चांगलीच बहरली आहे. त्यामुळे शेतकरी आंतरमशागतीच्या कामाला लागले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतात खुरपणी, कोळपणी, पिकांना खते देणे, औषध फवारणी ही कामे केली जात आहे. पिके वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करून प्रयत्न केले जात आहे.