शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

बेमोसमी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:24 IST

मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.

ठळक मुद्देमोनोरी : उन्हाळ कांदा काढणी अडकल्याने उत्पादन कर्त्यांची दमछाक

मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.ऐन उन्हाळ कांदा काढणीला मानोरी परिसरात सुरु वात केलेली असून निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणीचा तसाच पडून असल्याने मजूर वर्ग ऐन अवकाळी पावसाचा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीमुळे गत मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील दोन्ही पिके पाण्याअभावी करपल्याने पदरी निराशाच पडली असल्याने यंदाच्या अवकाळी पावसामुळे दुसºयांदा उन्हाळ कांदा शेतकºयांना कर्जबाजारी करणार अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.कांदा साठवून ठेवण्यासाथी कांदा चाळ तयार करण्यासाठी शेतकरी व्यस्त आहे.यंदा पर्जन्यमान कमी प्रमाणात झालेले असले तरी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात आधीच प्रमाणात घट झाली असल्याने या अवकाळी पावसामुळे कांदा नुकसानीची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असताना उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्गाची वानवा भासल्याने अनेक ठिकाणी कांदा पीक तसेच शेतात पडून आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मजूर दिवसभर कांदा काढणीचे काम उन्हात करू शकत नसून काही उन्हात काम करायचे असल्याचे उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्ग प्रति एकर आठ हजार रु पये इतका भाव मागत आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला असुन जमिनीत उष्णता जास्त असल्याने कांदा पातीसह काढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. कांदा काढण्याचा प्रयत्न केला असता कांदा जमिनीत तर पाथ हातात अशी गत उन्हाळ कांद्याची सध्या झालेली दिसून येत आहे. गत वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला रडकुंडीला आणले होते. सुमारे चार ते पाच महिने जुना उन्हाळ कांदा साठवून ठेवलेला असताना आॅक्टोबर महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळ कांदा विक्र ीला काढला होता. परंतु दिवसागणिक हेच गणित कायम राहिल्याने सुमारे चार ते पाच महिने उन्हाळ कांदा कवडीमोल भावाने विकून साधा कांदा उत्पादन खर्च देखील फिटलेला नाही.यामुळे यंदा उन्हाळ कांद्याची चाळीत साठवणूक ठेवत असले तरी भाव किती मिळणार याची शाश्वती कांदा उत्पादक शेतकºयांना नसल्याने यंदा पुन्हा निराशा पदरी तर पडणार नाही ना ! अशी चर्चा कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.मागील वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला अल्प दरामुळे नाकेनऊ आणले होते. त्यामुळे एकीकडे कांदा विकून खर्च सुद्धा फिटला नसताना मानोरी परिसरात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत असून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास दुसर्यांदा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाणार आहे.- भास्कर चिने, मानोरी.