शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

बेमोसमी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:24 IST

मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.

ठळक मुद्देमोनोरी : उन्हाळ कांदा काढणी अडकल्याने उत्पादन कर्त्यांची दमछाक

मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.ऐन उन्हाळ कांदा काढणीला मानोरी परिसरात सुरु वात केलेली असून निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणीचा तसाच पडून असल्याने मजूर वर्ग ऐन अवकाळी पावसाचा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीमुळे गत मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील दोन्ही पिके पाण्याअभावी करपल्याने पदरी निराशाच पडली असल्याने यंदाच्या अवकाळी पावसामुळे दुसºयांदा उन्हाळ कांदा शेतकºयांना कर्जबाजारी करणार अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.कांदा साठवून ठेवण्यासाथी कांदा चाळ तयार करण्यासाठी शेतकरी व्यस्त आहे.यंदा पर्जन्यमान कमी प्रमाणात झालेले असले तरी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात आधीच प्रमाणात घट झाली असल्याने या अवकाळी पावसामुळे कांदा नुकसानीची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असताना उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्गाची वानवा भासल्याने अनेक ठिकाणी कांदा पीक तसेच शेतात पडून आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मजूर दिवसभर कांदा काढणीचे काम उन्हात करू शकत नसून काही उन्हात काम करायचे असल्याचे उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्ग प्रति एकर आठ हजार रु पये इतका भाव मागत आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला असुन जमिनीत उष्णता जास्त असल्याने कांदा पातीसह काढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. कांदा काढण्याचा प्रयत्न केला असता कांदा जमिनीत तर पाथ हातात अशी गत उन्हाळ कांद्याची सध्या झालेली दिसून येत आहे. गत वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला रडकुंडीला आणले होते. सुमारे चार ते पाच महिने जुना उन्हाळ कांदा साठवून ठेवलेला असताना आॅक्टोबर महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळ कांदा विक्र ीला काढला होता. परंतु दिवसागणिक हेच गणित कायम राहिल्याने सुमारे चार ते पाच महिने उन्हाळ कांदा कवडीमोल भावाने विकून साधा कांदा उत्पादन खर्च देखील फिटलेला नाही.यामुळे यंदा उन्हाळ कांद्याची चाळीत साठवणूक ठेवत असले तरी भाव किती मिळणार याची शाश्वती कांदा उत्पादक शेतकºयांना नसल्याने यंदा पुन्हा निराशा पदरी तर पडणार नाही ना ! अशी चर्चा कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.मागील वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला अल्प दरामुळे नाकेनऊ आणले होते. त्यामुळे एकीकडे कांदा विकून खर्च सुद्धा फिटला नसताना मानोरी परिसरात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत असून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास दुसर्यांदा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाणार आहे.- भास्कर चिने, मानोरी.