शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:18 IST

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकºयांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकºयांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाºयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाºयांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारपासून (दि. १७) त्यांची कांद्याची रक्कम मिळणार आहे.

ठळक मुद्दे कांदा व्यापाºयांनी जमा केले १६ लाख रुपये शेतकºयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकºयांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकºयांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाºयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाºयांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारपासून (दि. १७) त्यांची कांद्याची रक्कम मिळणार आहे.बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी या प्रकरणी ९ मे रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजू पठारे व राकेश आढाव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोघा संशयितांना अटकही केली होती.फेब्रुवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ६३ शेतकºयांना देण्यात आलेले १४ लाख ६३ हजार ७४३ रुपयांचे धनादेश न वटता परत आल्याने शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. कांदा व्यापारी राजू सदाशिव पठारे (रा. वाशी, नवी मुंबई) व राकेश भास्कर आढाव (रा. वावीवेस, सिन्नर) या दोघांची नाशिक अ‍ॅग्रो नावाने नोंदणीकृत फर्म सन २०१३ पासून बाजार समितीच्या आवारात शेतकºयांकडून कांदा खरेदीचा व्यवहार करते. गेल्या चार महिन्यांत तालुक्यातील ६९ शेतकºयांना नाशिक अ‍ॅग्रोने कांदा खरेदीपोटी धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेतून न वटता परत आल्याने व व्यापारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन झुलवत ठेवत असल्याने शेतकºयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.बाजार समितीमार्फत नाशिक अ‍ॅग्रोकडे विचारणा करण्यात येऊन शेतकºयांचे कांदा खरेदीचे पैसे तत्काळ अदा करण्याची सूचना करण्यात आली होती. सभापती विनायक तांबे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सचिव विखे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. व्यापाºयांनी शेतकºयांची कांदा खरेदीची रक्कम १६ लाख ३७ हजार रुपये १४ मे रोजी बाजार समितीकडे जमा केली आहे. त्यामुळे बाजार समिती आरटीजीएसद्वारा परस्पर शेतकºयांचे पैसे खात्यात वर्ग करणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज यांच्याकडून कांदा विक्रीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांनी ताबडतोब बाजार समितीच्या सिन्नर कार्यालयात मूळ धनादेशाची प्रत, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, हिशेबपट्टी, पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.