शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:18 IST

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकºयांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकºयांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाºयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाºयांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारपासून (दि. १७) त्यांची कांद्याची रक्कम मिळणार आहे.

ठळक मुद्दे कांदा व्यापाºयांनी जमा केले १६ लाख रुपये शेतकºयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकºयांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकºयांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाºयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाºयांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारपासून (दि. १७) त्यांची कांद्याची रक्कम मिळणार आहे.बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी या प्रकरणी ९ मे रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजू पठारे व राकेश आढाव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोघा संशयितांना अटकही केली होती.फेब्रुवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ६३ शेतकºयांना देण्यात आलेले १४ लाख ६३ हजार ७४३ रुपयांचे धनादेश न वटता परत आल्याने शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. कांदा व्यापारी राजू सदाशिव पठारे (रा. वाशी, नवी मुंबई) व राकेश भास्कर आढाव (रा. वावीवेस, सिन्नर) या दोघांची नाशिक अ‍ॅग्रो नावाने नोंदणीकृत फर्म सन २०१३ पासून बाजार समितीच्या आवारात शेतकºयांकडून कांदा खरेदीचा व्यवहार करते. गेल्या चार महिन्यांत तालुक्यातील ६९ शेतकºयांना नाशिक अ‍ॅग्रोने कांदा खरेदीपोटी धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेतून न वटता परत आल्याने व व्यापारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन झुलवत ठेवत असल्याने शेतकºयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.बाजार समितीमार्फत नाशिक अ‍ॅग्रोकडे विचारणा करण्यात येऊन शेतकºयांचे कांदा खरेदीचे पैसे तत्काळ अदा करण्याची सूचना करण्यात आली होती. सभापती विनायक तांबे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सचिव विखे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. व्यापाºयांनी शेतकºयांची कांदा खरेदीची रक्कम १६ लाख ३७ हजार रुपये १४ मे रोजी बाजार समितीकडे जमा केली आहे. त्यामुळे बाजार समिती आरटीजीएसद्वारा परस्पर शेतकºयांचे पैसे खात्यात वर्ग करणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची नाशिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज यांच्याकडून कांदा विक्रीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांनी ताबडतोब बाजार समितीच्या सिन्नर कार्यालयात मूळ धनादेशाची प्रत, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, हिशेबपट्टी, पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.