शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

वाडीवऱ्हे परिसरात शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

वाडीवऱ्हे : परिसरात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. भात लावण्या खोळंबल्या आहेत. ...

वाडीवऱ्हे : परिसरात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. भात लावण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे भात उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे. मात्र, या वर्षी दीड महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भात लावणीची कामे खोळंबली असून, टाकलेली भात रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतकरी चिंतातुर झाले आहेत. एकीकडे प्रचंड महगाई. त्यात मजूर मिळत नाहीत. यांत्रिक शेती महाग झाली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी काळजीत असताना त्यात हे अस्मानी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

---------------------

एकीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे यांत्रिक शेती महाग झाली आहे. मजूर मिळत नसल्याने आणि जे आहेत ते अवाच्या सव्वा मजुरी मागत आहेत. खते, बी-बियाणे प्रचंड महाग झाले आहेत. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे.

-मोहन कारभारी कातोरे, शेतकरी

----------------------

पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, टाकलेली भातरोपे काही ठिकाणी जास्त दिवसांचे झाली आहेत. काही ठिकाणी भातरोपे पाण्याअभावी जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा भातरोपांसाठी बियाणे घेण्यासाठी येऊ लागले आहेत.

-दशरथ दिवटे, कृषी माल विक्रेते