शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

वाडीवऱ्हे परिसरात शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

वाडीवऱ्हे : परिसरात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. भात लावण्या खोळंबल्या आहेत. ...

वाडीवऱ्हे : परिसरात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. भात लावण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे भात उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे. मात्र, या वर्षी दीड महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भात लावणीची कामे खोळंबली असून, टाकलेली भात रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतकरी चिंतातुर झाले आहेत. एकीकडे प्रचंड महगाई. त्यात मजूर मिळत नाहीत. यांत्रिक शेती महाग झाली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी काळजीत असताना त्यात हे अस्मानी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

---------------------

एकीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे यांत्रिक शेती महाग झाली आहे. मजूर मिळत नसल्याने आणि जे आहेत ते अवाच्या सव्वा मजुरी मागत आहेत. खते, बी-बियाणे प्रचंड महाग झाले आहेत. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे.

-मोहन कारभारी कातोरे, शेतकरी

----------------------

पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, टाकलेली भातरोपे काही ठिकाणी जास्त दिवसांचे झाली आहेत. काही ठिकाणी भातरोपे पाण्याअभावी जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा भातरोपांसाठी बियाणे घेण्यासाठी येऊ लागले आहेत.

-दशरथ दिवटे, कृषी माल विक्रेते